शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पेण एसटी कर्मचारी वसाहतीचे झाले खंडर

By admin | Updated: February 5, 2017 02:55 IST

पेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत.

- वैभव गायकर,  पनवेलपेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. वसाहतीला पाणी पुरविणाऱ्या विहिरीजवळून गटार जात असल्याने, पिण्याचे पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ८ डेपोचे व्यवस्थापन करण्यासाठी रामवाडी येथे विभागीय आगार उभारले आहे. १९७२ मध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी वसाहत बांधण्यात आली आहे. यामध्ये १३ चाळी व तीनमजली पाच इमारतींचा समावेश आहे. ४५ वर्षांमध्ये वसाहतीच्या देखभालीकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. इमारतीची रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे करण्यात आली नाहीत. यामुळे इमारती धोकादायक बनल्या आहेत. प्लास्टर पडू लागले आहे. छतामधील लोखंड बाहेर आले आहे. ज्या तीन इमारतींमध्ये कर्मचारी वास्तव्य करत आहेत, त्यांची स्थितीही चांगली नाही. वसाहतीमध्ये १३ चाळी आहेत. चाळींचीही योग्य देखभाल केली जात नाही. वसाहतीमधील काही गटारे उघडी असून, यात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. वस्तीमध्ये कचराकुंडी नाही. टाकलेला कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थित बाहेर जात नाही. १० एकर पेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली आहे. चाळींच्या आजूबाजूला वाढलेले गवतही काढण्यात आलेले नाही. एस. टी. कर्मचारी वसाहतीला येथील विहिरीमधून पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीपासून काही अंतरावरून गटार वाहत असल्याने, दूषित पाणी विहिरीत जाण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी वारंवार सांगूनही गटाराचा प्रवाह बदलला जात नाही. महामंडळाची करोडो रुपयांची मालमत्ता धूळ खात पडली आहे. येथील वसाहतीची पुनर्बांधणी व सुशोभीकरण करण्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशीच स्थिती राहिली, तर सर्व इमारती खाली करून कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्याची वेळ येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष रामवाडी कर्मचारी वसाहतीमधील दोन इमारती खाली केल्या आहेत. उर्वरित तीन इमारतींची स्थितीही बिकट झाली आहे. चाळीही मोडकळीस आल्या आहेत. पूर्ण वसाहतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे, परंतु प्रशासनाकडून अद्याप पुनर्बांधणीसाठी फारशा हालचाली झालेल्या नाहीत. यामुळे भविष्यात टप्याटप्प्याने सर्व इमारती खाली केल्या जाण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत अभियानाचा विसर रामवाडी बस आगार व कर्मचारी वसाहतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे.रोडच्या बाजूला कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन खराब झाल्याने, आगाराच्या मागील बाजूला पाणी बाहेर आले असून, दुर्गंधी पसरली आहे.प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूलाही कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. १० एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली असली, तरी देखभाल दुरुस्तीअभावी तिची दुर्दशा झाली आहे.