शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
4
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
5
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
6
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
7
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
8
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
9
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
10
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
11
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
12
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
13
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
14
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
15
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
16
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
17
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
19
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:54 IST

ग्रामीण भागातही पाण्याची समस्या गंभीर

- वैभव गायकरपनवेल : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. आबासाहेब वेदक (देहरंग) धरणातील अपुरा पाणीसाठा या गोष्टीला कारणीभूत ठरणार आहे. कारण या धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याची झळ पनवेलवासीयांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना दिवसाआड पाणी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात देहरंग धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देहरंग धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला खारघरमध्ये ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात त्या भागात ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. कामोठे नोडला ६० एमएलडीऐवजी फक्त ३५ एमएलडी पाणी दिले जाते. तळोजा नोडसाठी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ १० एमएलडी पाण्यावर येथील रहिवाशांची बोळवण केली जात आहे. नवीन पनवेल शहराला ४६ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ४० एमएलडी पाणी दिले जाते. पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गावांना केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट २९ गावांना अद्यापही बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ४०० कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत ४० जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. १६५ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, सद्यस्थितीत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण पालिका क्षेत्राला सध्याच्या घडीला २९५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पालिका क्षेत्राला सुमारे ८५ ते ९० एमएलडी तुटवडा भासत आहे.२९ गावांना बोरिंग, विहिरींचा आधारपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड या ११ गावांचा यात समावेश आहे.पाणी परिषद भरविण्याची मागणीशहराला भेडसावणाऱ्या गंभीर पाणीप्रश्नावर पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. या अंतर्गत शहरासाठी पाण्याचे नियोजन, किती वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या पाणी परिषदेत देण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.पनवेलकरांना मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापाणीसाठा किती आहे, शेवटपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी भाजपामार्फत घेतली जाईल. पालिका प्रशासनासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल.- प्रकाश बिनेदार, नगरसेवककेंद्रापासून, राज्यात, पालिकेत सत्तेत भाजपा आहे. सिडको अध्यक्ष, महापौरपद भाजपाकडे असताना पनवेलकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. पालिका क्षेत्रातील अपुºया पाणीपुरवठ्यावरून खुद्द भाजपाच मोर्चे काढत आहे, हे हास्यास्पद आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanvelपनवेल