शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:54 IST

ग्रामीण भागातही पाण्याची समस्या गंभीर

- वैभव गायकरपनवेल : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. आबासाहेब वेदक (देहरंग) धरणातील अपुरा पाणीसाठा या गोष्टीला कारणीभूत ठरणार आहे. कारण या धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याची झळ पनवेलवासीयांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना दिवसाआड पाणी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात देहरंग धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देहरंग धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला खारघरमध्ये ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात त्या भागात ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. कामोठे नोडला ६० एमएलडीऐवजी फक्त ३५ एमएलडी पाणी दिले जाते. तळोजा नोडसाठी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ १० एमएलडी पाण्यावर येथील रहिवाशांची बोळवण केली जात आहे. नवीन पनवेल शहराला ४६ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ४० एमएलडी पाणी दिले जाते. पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गावांना केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट २९ गावांना अद्यापही बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ४०० कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत ४० जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. १६५ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, सद्यस्थितीत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण पालिका क्षेत्राला सध्याच्या घडीला २९५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पालिका क्षेत्राला सुमारे ८५ ते ९० एमएलडी तुटवडा भासत आहे.२९ गावांना बोरिंग, विहिरींचा आधारपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड या ११ गावांचा यात समावेश आहे.पाणी परिषद भरविण्याची मागणीशहराला भेडसावणाऱ्या गंभीर पाणीप्रश्नावर पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. या अंतर्गत शहरासाठी पाण्याचे नियोजन, किती वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या पाणी परिषदेत देण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.पनवेलकरांना मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापाणीसाठा किती आहे, शेवटपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी भाजपामार्फत घेतली जाईल. पालिका प्रशासनासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल.- प्रकाश बिनेदार, नगरसेवककेंद्रापासून, राज्यात, पालिकेत सत्तेत भाजपा आहे. सिडको अध्यक्ष, महापौरपद भाजपाकडे असताना पनवेलकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. पालिका क्षेत्रातील अपुºया पाणीपुरवठ्यावरून खुद्द भाजपाच मोर्चे काढत आहे, हे हास्यास्पद आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanvelपनवेल