शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:54 IST

ग्रामीण भागातही पाण्याची समस्या गंभीर

- वैभव गायकरपनवेल : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. आबासाहेब वेदक (देहरंग) धरणातील अपुरा पाणीसाठा या गोष्टीला कारणीभूत ठरणार आहे. कारण या धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याची झळ पनवेलवासीयांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना दिवसाआड पाणी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात देहरंग धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देहरंग धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला खारघरमध्ये ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात त्या भागात ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. कामोठे नोडला ६० एमएलडीऐवजी फक्त ३५ एमएलडी पाणी दिले जाते. तळोजा नोडसाठी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ १० एमएलडी पाण्यावर येथील रहिवाशांची बोळवण केली जात आहे. नवीन पनवेल शहराला ४६ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ४० एमएलडी पाणी दिले जाते. पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गावांना केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट २९ गावांना अद्यापही बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ४०० कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत ४० जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. १६५ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, सद्यस्थितीत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण पालिका क्षेत्राला सध्याच्या घडीला २९५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पालिका क्षेत्राला सुमारे ८५ ते ९० एमएलडी तुटवडा भासत आहे.२९ गावांना बोरिंग, विहिरींचा आधारपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड या ११ गावांचा यात समावेश आहे.पाणी परिषद भरविण्याची मागणीशहराला भेडसावणाऱ्या गंभीर पाणीप्रश्नावर पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. या अंतर्गत शहरासाठी पाण्याचे नियोजन, किती वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या पाणी परिषदेत देण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.पनवेलकरांना मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापाणीसाठा किती आहे, शेवटपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी भाजपामार्फत घेतली जाईल. पालिका प्रशासनासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल.- प्रकाश बिनेदार, नगरसेवककेंद्रापासून, राज्यात, पालिकेत सत्तेत भाजपा आहे. सिडको अध्यक्ष, महापौरपद भाजपाकडे असताना पनवेलकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. पालिका क्षेत्रातील अपुºया पाणीपुरवठ्यावरून खुद्द भाजपाच मोर्चे काढत आहे, हे हास्यास्पद आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanvelपनवेल