शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाच्या तडाख्याने भातपीक आडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:29 IST

शेतकरी हवालदिल : विमा कवचाचाही लाभ नाही

अलिबाग : गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव या तालुक्यांतील काही ठिकाणी भातपीक आडवे झाले होते. जिल्ह्यातील नुकसानीचा एकूण आकडा हा सुमारे पाच टक्क्यांपेक्षा कमी दिसत असला, तरी यामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे ९५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ३५० हेक्टरवरील ६०० शेतकºयांनीच विमा संरक्षण घेतले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या शेतीचा पंचनामा झाल्याशिवाय कोणाचे किती नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले होते का? हे स्पष्ट होणार आहे.

वादळी वाºयासह बरसणाºया पावसाने मागील आठवड्यामध्ये सर्वांचीच चांगलीच त्रेधातिरपीट उडवून दिली होती. ठिकठिकाणी झाडे पडणे, घरांचे छप्पर उडणे, गोठ्यांची पडझड असे प्रकार घडले होते. विजेच्या तडाख्यामुळे अनेक गुराढोरांना आपले प्राण गमवावे लागले होते. सोसाट्याच्या वाºयासह बरसणाºया पावसामुळे शेतातील भातपीक आडवे झाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, पेण, माणगाव, कर्जत या तालुक्यांचा समावेश आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेतले जाते. हेक्टरी ४० क्विंटल भाताचे, तर २८ क्विंटल तांदळाचे उत्पादन होते. त्यानुसार ३८ लाख क्विंटल भात आणि २६ लाख ६० हजार क्विंटल तांदळाच उत्पादन होते. सर्वत्र झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा नसला, तरी ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी फार मोठा आर्थिक फटका असल्याचे बोलले जाते. कारण उभे पीक मातीमोल झाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी विमा कवच घेण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील फक्त ३५० हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ६०० शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले आहे. सरकारचे ८०० रुपये आणि शेतकºयांचे ८०० रुपये, असा एकदाच हफ्ता भरायचा असतो. तसेच एका शेतकºयांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तर विम्याचा लाभ मिळतो.

तसेच आपल्याकडील शेतकºयांच्या नावावर एकरामध्ये शेती नसल्याने विम्याची रक्कम नगण्य अशीच असते. त्यामुळे शेतकरी विम्याचे कवच घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.मजुरीचा खर्च मोठाच्भात कापणीसाठी लागणाºया मजुरांची सध्या चणचण भासत आहे. जे मजूर उपलब्ध होतात, त्यांना सुमारे ५०० रु पयांची रक्कम मजुरी म्हणून द्यावी लागते. मजुरांना जेवण, दोन वेळचा चहा-नाश्ता तसेच येण्या-जाण्याचा प्रवास खर्च द्यावा लागतो. कापणीचा हंगाम सर्वत्र एकाच वेळी आल्याने मजुरांनी आपल्या मजुरीत वाढ केली आहे. वाढत जाणाºया मजुरीचा दर शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाताच्या उत्पन्नापेक्षा मजुरी अधिक द्यावी लागत असल्याने शेती परवडत नसल्याचे वाघ्रण येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही. सुमारे पाच टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यामुळे भातपिकाच्या उत्पादनावर विशेष फरक पडणार नाही. पंचनामा केल्यावरच नेमके किती नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले होते का हे स्पष्ट होईल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक