शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आमची वारी हुकली, पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावा; वारकऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:14 IST

विठ्ठलाची भेट होणार नसल्याने आमच्यावर दुखद प्रसंग ओढवल्याची जाणीव होते. वारीला जाताना पांडुरंग हा आमच्यासोबत चालत असतो. त्यावेळी तो देवळात नसतो. तारणहार तोच आहे.

रायगड -  ५० वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, रोहा येथील दिंड्या पंढरीची वारी करत आहेत. कोरोना संकटामुळे प्रथमच त्यांच्या वारीला जाण्यामध्ये खंड पडला आहे. माउलीची भेट होणार नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यांमधून प्रत्येकी एक अशा १५ दिंड्या निघतात. एका दिंडीमध्ये किमान ६०० माणसे असतात. या सर्व नोंदणीकृत दिंड्या आळंदीला एकत्र येतात. तेथून पुढे रायगडची दिंडी अशी ओळख मिळते. या दिंडीसाठी ५० नंबरचा क्रमांक आहे.पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावाजगावर आलेल्या महामारीच्या संकटामुळे आमचा पांडुरंगही देवळात बंदिस्त झाला आहे. आषाढ महिन्यात त्याच्यासोबतच्या भेटीची ओढ आम्हाला लागली आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे प्रथमच आम्हाला वारीला जाता येत नाहीय. शालेय जीवनापासून मी वारीचा आणि माउलीच्या भेटीचा आनंद लुटत आलो आहे.

विठ्ठलाची भेट होणार नसल्याने आमच्यावर दुखद प्रसंग ओढवल्याची जाणीव होते. वारीला जाताना पांडुरंग हा आमच्यासोबत चालत असतो. त्यावेळी तो देवळात नसतो. तारणहार तोच आहे. तोच रक्षीले आम्हा, करू आम्ही पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावा, अशी पांडुरंगाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. -ह.भ.प.विद्याधर महाराज निळकर, अलिबागकोरोनामुळे आमची वारी हुकलीवारीला जाताना विठू माउली नेहमीच आमच्यासोबत चालत असते. त्यामुळे कधीच थकवा अथवा कंटाळा येत नाही. आज कोरोनासारख्या रोगाने आमची वारी हुकली आहे. वारीला जाता न येणे हे दु:ख फक्त विठ्ठलाच्या भक्तालाच समजू शकते. त्याच्या भेटीची वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहत होते. आज भेटीचा योग आला होता, तो मात्र कोरोनामुळे ढळला आहे. पांडुरंगाची भेट न होणे हे दु:ख फार मोठे आहे. वर्षातून एकदा माउलीचे दर्शन होणे म्हणजे प्रत्यक्ष भेटीची अनुभूती असते. आता मनातूनच पंढरीला पाहोेचून माउलीला दंडवत करते. माउलीला एवढेच साकडे आहे की, जगावरील कोरोनाचे संकट तत्काळ दूर कर. -पवित्रा सिंगासने, वारकरीपाडुरंगाची भेट न झाल्याने अतीव दु:खजगावर आलेले कोरोनाचे संकट हे न भूतो न भविष्यती असेच आहे. याच संकटामुळे आमची पांडुरंगासोबतची भेट रखडली आहे. पांडुरंगाशी इतके एकरूप झालो आहोत की, डोळे मिटल्यावर त्याचेच दर्शन होते. पांडुरंग आणि भक्तांचे नाते फार महान आहे. भक्तांच्या हाकेला तो नेहमी धावतो. त्याच्या दर्शनाने सर्व दुख, नैराश्य, थकवा सर्व एका चुटकीसरशी निघून जातात. आयुष्यात पहिल्यांदा वारी हुकल्याचे आणि पांडुरंगाची भेट न झाल्याचे अतीव दु:ख होत आहे. ऊन, वारा पाऊस याची कसलीही तमा न बाळगता वारकरी वारीत सामील झालेला असतो. वाटेत अनेक संकटे येतात. मात्र, प्रत्येकाच्या मनामध्ये माउलीच्या भेटीची ओढ लागलेली असते. त्यामुळे सर्व संकटे तुडवत आम्ही देवाच्या चरणी लीन होतो. देवाने जगावरील संकट दूर करावे. -ह.भ.प. मारुती महाराज कोल्टकर, रोहामाझी माउली कोसो दूरमाझी माउली माझ्यापासून कोसो दूर आहे. वारीला जाण्याची उत्कंठा सातत्याने लागलेली असते. डोळ्यात पांडुरंगाचे रूप साठवून ठेवले, तरी ते कमीच वाटते. याची देही याची डोळा, अशी भेट होणे हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा असतो. मात्र, या वर्षी तसे घडणार नसल्याने मनाला फार वेदना होत आहेत. मी कधी पायी दिंडीत सामील झाले, तर कधी वाहनाचा वापर केला. मात्र, पायी दिंडीत असणारे वातावरण मन प्रसन्न करणारे असते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पांडुरंगाच्या भेटीची ओढ दिसून यायची. विठू माउलीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या वर्षी भेट झाली नसली, तरी पुढल्या खेपेला नव्या जोमाने जाणार असल्याने भेटीची ओढ कायमच राहणार आहे. -हेमलता भगत, वारकरी

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी