शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शहापूर विस्तारित एमआयडीसीला विरोध, भूसंपादनास ८०० शेतकऱ्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:06 IST

अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे विस्तारित एमआयडीसी उभारण्यासाठी करण्यात येणाºया भूसंपादनाला तब्बल ८०० शेतकऱ्यांनी मंगळवारी हरकती घेतल्या.

अलिबाग : तालुक्यातील शहापूर येथे विस्तारित एमआयडीसी उभारण्यासाठी करण्यात येणाºया भूसंपादनाला तब्बल ८०० शेतकऱ्यांनी मंगळवारी हरकती घेतल्या. हरकती घेण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाल्याने अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. शहापूर परिसरातील शेतकºयांनी टाटा-रिलायन्सच्या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध केला होता. त्या वेळीही सक्तीने संपादन करण्याचा प्रयत्न झाला होता.आता दुसºयांदा आंदोलन करायची वेळ शेतक-यांवर आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे आताच्या प्रांताधिकारी शारदा पोवार त्या वेळी तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. अलिबाग हे मुंबईपासून अगदी जवळ असलेला तालुका आहे. अलिबागमध्ये मोठ्या संख्येने जमिनी असल्याने त्यावर सहाजिकच उद्योजकाचा डोळा असणे स्वभाविकच आहे. त्यामुळे टाटा-रिलायन्स पाठोपाठ आता सरकारनेच येथे जमीन संपादनाचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. टाटा- रिलायन्सने २००६-०७ साली येथे कोळशावर आधारित औष्णिक प्रकल्प उभारण्याची तयारी केली होती.स्थानिक शेतकºयांनी विनाशकारी प्रकल्पांना विरोध केला होता. शेतकºयांचा विरोध हाणून पाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, असे पर्याय वापरण्यात आले. मात्र, शेतकºयांच्या जमिनीवरील आणि न्यायालयीन लढाईविरोधात दोन्ही बलाढ्य कंपन्यांना माघार घ्यावी लागली होती. शहापूर गावातील सुमारे १८२ जणांनी आॅक्टोबर २०१८ साली या ठिकाणी प्रकल्प उभारावा, अशी मागणी सरकारकडे केली होती.मोक्याची जागा असल्याने सरकारने तातडीने त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून शहापूर येथे एमआयडीसी विस्तारित शहापूर औद्योगिक क्षेत्र घोषित केले. त्यानुसार त्या ठिकाणची जमीन संपादन करण्याबाबतची नोटीसही शेतकºयांना पाठवण्यात आल्या.हरकतीमधील महत्त्वाचे मुद्देआपल्या जमिनीवर नेमका कोणता प्रकल्प येणार आहे याची माहिती दिलेली नाही, तसेच ज्या शेतकºयांनी मागणी केली आहे. त्या शेतकºयांच्या गावाचे नाव /गट नं /सर्व्हे नं क्षेत्र याची कोणतीही माहिती आपल्या कार्यालयास माहीत नाही. आपण प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी पनवेल यांना पाठवलेले पत्र बेकायदेशीर आहेच; परंतु खातरजमा न करता शेतकºयांना न कळवता त्यांची संमती न घेता केलेली कृती बेकायदा ठरते. त्यामुळे त्याचा संपूर्ण खुलासा होणे गरजेचे आहे. कारण संमती नसताना केलेली प्रशासनाची कृती गंभीर आहे, असेही हरकतीमध्ये म्हटले आहे.शहापूर विस्तारित एमआयडीसीमध्ये येणाºया उद्योगाचा विस्तृत प्रकल्प अहवाल, प्रकल्पास आवश्यक जागा, पर्यावरणावर होणारे परिणाम या विषयी कुठेही माहिती दिलेली नाही. उलट पक्षी ती जनतेपासून लपवून ठेवलेली आहे. त्यामुळे हे संपादन पूर्णत: बेकायदा असल्याने संपादनाला पूर्ण विरोध आहे. काही ठिकाणी महसूलच्या नोंदी प्रलंबित आहेत. जमिनीचे खातेदार व हितसंबंधी वेगळे असू शकतात. त्या सर्वांना या संपादनाची माहिती मिळावी म्हणून नोटीस तर पाठवली पाहिजेच; पण गावात दवंडीदेखील दिली पाहिजे. असे न झाल्यास संबंधितांना हरकत घेता येणार नाही. शिवाय, त्यातून त्यांचा हक्क डावलला गेल्यास संबंधिताचे अर्थिक नुकसान तर होईलच; पण पुनर्वसन कोणाचे करावे याबाबत प्रश्न निर्माण होतील.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दलभरावामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यास येणार अडचणऔद्योगिक प्रस्तावासाठी संपादन करताना किंवा केल्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये तीन मीटर उंचीचा भराव केला जाईल. अशा भरावामुळे या क्षेत्राच्या लगतचा संपूर्ण खाडीपरिसर, किनारे, खाजण, गावे, गावठाणे, मिठागरे यातील पाण्याचा नैसिर्गकरीत्या निचरा होणार नाही, तसेच भरती-ओहटीच्या नैसर्गिक हालचालीवर नियंत्रण राहाण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णत: नष्ट होणार आहे, असे सुनील नाईक यांनी सांगितले. परिणामी, निर्माण होणाºया पूरपरिस्थितीमुळे मोठ्या क्षेत्रातील शेती व जनजीवन बाधित होणार असल्याने विरोध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raigadरायगड