शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:27 AM

पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदी तालुक्यासाठी वरदान आहे. या नदीवर अनेक पाणीयोजना कार्यन्वित असून, अनेक गावांची तहान ही नदी भागवते. अशीच पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वंजारपाड्यातील ग्रामस्थांची तारांबळ उडत असून, महिलांना रात्र विहिरीवर जागून काढावी लागत आहे. दरम्यान, पाणीयोजनेच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे थेट जिल्ह्यधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा, शेंडेवाडी या गावांसाठी २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आली होती. एका वर्षाच्या आत योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.उल्हास नदीवरून साधारण दीड कि.मी. अंतरावरून पाणी गावात आणले गेले. गावात घरोघरी नळही बसवले गेले, नळाला पाणी आले. मात्र, आता ही पाणी योजना नावापुरती उरली आहे. पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीने ग्रामपंचायतीकडे ही योजना हस्तांतर केलीच नाही आणि नळाला आलेल्या पाण्याचे कोणाला बिलही आले नाही. परिणामी, योजना आता नावापुरती उरली आहे. ४९ लाख रुपये एवढा निधी खर्च करून बनवलेल्या या पाणी योजनेची जलवाहिनी प्लास्टिकची आहे, त्यामुळे ती सतत कुठेतरी फुटते. विजेचे बिल थकीत आहे, तर मोटार चोरीला जाण्याच्या आणि त्या व्यवस्थित न हाताळल्यामुळे जळण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.गावातील एकमेव विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. मात्र, विहिरीलाही पाणी मर्यादित असल्याने पाण्यासाठी महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत आहे. अनेकदा बैठकी घेऊन पाणीपुरवठा समितीकडे याबाबत विचारणाही करण्यात आली आहे. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावातील या पाणीबाणीमुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, योजनेच्या चौकशीसाठी थेट जिल्हाधिकारी रायगड यांना तक्रारी अर्ज सादर केला आहे.पाणी योजना सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीजपुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने मोटार जळाली होती, ती दुरुस्त करून लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा सुरू होईल.- बाबूराव माळी,सचिव, पाणीपुरवठा समितीवयामुळे डोक्यावरून हंडे भरून आणणे आता शक्य होत नाही आणि आणलेले पाणी पुरतही नाही. पाणी विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आम्ही करायचे काय? पाण्याविना मरण पत्करावे का?- मनुताई धुळे,वयोवृद्ध महिला ग्रामस्थबायकांना घरातली कामे आणि पाणी दोघांचा मेळ बसवावा लागतो; पण तो न बसल्याने आमची तारांबळ उडते. एवढी पाणी योजना गावात येऊन तिचा आम्हाला काय फायदा झाला?- मंदाबाई आगे,महिला ग्रामस्थ

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी