शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावे पीत आहेत दूषित पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:44 IST

पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावे

वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २९ पैकी ९ गावे अद्यापही दूषित पाणी पीत आहेत. या गावातील पाण्याच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी याकरिता एका वर्षापूर्वी या गावांमध्ये आरओ सिस्टम लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन वर्षे उलटून गेली तरी केवळ दोन गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी हा प्रस्ताव पुढे आणला होता. अनेक वर्षांपासून २९ गावांपैकी ११ गावांतील रहिवासी दूषित पाणी पीत होते. यानंतर किरवली आणि धानसर या दोन गावांमध्ये मंजूर ठरावानुसार आरओ सिस्टम बसविण्यात आली. उर्वरित ९ गावांमध्ये ही सिस्टम कधी बसवणार याबाबत नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी गुरुवारी पार पडलेल्या महासभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दोन गावांत ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगितले. उर्वरित ९ गावांमध्येदेखील लवकरच ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. पालिका क्षेत्रात ११ गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, दोन वर्षांचा कार्यकाळ उलटला तरी अद्याप या प्रस्तावाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने बाविस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी लवकरात लवकर उर्वरित गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना महासभेत केली.

दरम्यान, पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून या गावातील रहिवासी बाजारातून विकत आणलेले पाणी पीत आहेत. ‘अमृत योजने’मुळे २९ गावांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. मात्र योजनेचे काम पूर्णपणे मार्गी लागण्यास आणखी काही वर्षे उलटण्याची शक्यता आहे.

बोअरवेलवर अवलंबूनसध्याच्या घडीला तुर्भे, एकटपाडा, तळोजे मजकूर, अडीवली, रोहिजन, बीड, धरणा कॅम्प, करवले आदीं गावांमध्ये जलवाहिन्याच पोहोचल्या नसल्याने या गावांमधील रहिवाशांना विहीर, बोअरवेलवरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

अंमलबजावणी नाहीपालिका क्षेत्रात ११ गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी नीलेश बाविस्कर सभापती असताना मंजूर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ उलटला तरी अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :Waterपाणी