शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नऊ गावे पीत आहेत दूषित पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:44 IST

पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावे

वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २९ पैकी ९ गावे अद्यापही दूषित पाणी पीत आहेत. या गावातील पाण्याच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी याकरिता एका वर्षापूर्वी या गावांमध्ये आरओ सिस्टम लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन वर्षे उलटून गेली तरी केवळ दोन गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी हा प्रस्ताव पुढे आणला होता. अनेक वर्षांपासून २९ गावांपैकी ११ गावांतील रहिवासी दूषित पाणी पीत होते. यानंतर किरवली आणि धानसर या दोन गावांमध्ये मंजूर ठरावानुसार आरओ सिस्टम बसविण्यात आली. उर्वरित ९ गावांमध्ये ही सिस्टम कधी बसवणार याबाबत नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी गुरुवारी पार पडलेल्या महासभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दोन गावांत ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगितले. उर्वरित ९ गावांमध्येदेखील लवकरच ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. पालिका क्षेत्रात ११ गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, दोन वर्षांचा कार्यकाळ उलटला तरी अद्याप या प्रस्तावाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने बाविस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी लवकरात लवकर उर्वरित गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना महासभेत केली.

दरम्यान, पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून या गावातील रहिवासी बाजारातून विकत आणलेले पाणी पीत आहेत. ‘अमृत योजने’मुळे २९ गावांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. मात्र योजनेचे काम पूर्णपणे मार्गी लागण्यास आणखी काही वर्षे उलटण्याची शक्यता आहे.

बोअरवेलवर अवलंबूनसध्याच्या घडीला तुर्भे, एकटपाडा, तळोजे मजकूर, अडीवली, रोहिजन, बीड, धरणा कॅम्प, करवले आदीं गावांमध्ये जलवाहिन्याच पोहोचल्या नसल्याने या गावांमधील रहिवाशांना विहीर, बोअरवेलवरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

अंमलबजावणी नाहीपालिका क्षेत्रात ११ गावांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी नीलेश बाविस्कर सभापती असताना मंजूर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ उलटला तरी अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :Waterपाणी