शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मानगड किल्ल्यावर सोयीसुविधांची गरज; पर्यटकांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:09 IST

गडावरील प्राचीन अवशेषांचे जतन करण्याची मागणी

गिरीश गोरेगावकर माणगाव : रायगडचा उपदुर्ग अशी ओळख असलेल्या किल्ले मानगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गडपायथ्याशी तसेच गडावर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी बोरवाडी परिसरातून होत आहे.निजामपूर रायगड मुख्य रस्त्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मानगड ऐतिहासिक अवशेषांनी संपन्न असल्याचे दिसून येते. गडावर पाण्याचे टाके, राजसदर, दिंडीदरवाजा, दोन भक्कम बुरूज, किल्लेदारांच्या वाड्याचे अवशेष, प्राचीन लेणी असे पुरावे शेष आढळून येतात. राजधानी रायगडकडे येणारे मुंबई-पुण्याकडील पर्यटक आवर्जून येत असतात. काही पर्यटक तर रात्री मुक्कामालाही असतात. शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीही येऊ लागल्या आहेत; परंतु सोयीसुविधांचा अभाव असल्याने पर्यटक नाराज होत असतात, म्हणूनच मानगडवाडी गावात सुसज्ज पर्यटक निवास, वाहनतळ पार्किंगची व्यवस्था, मानगडवाडीपासून इंजाई मंदिरापर्यंत विद्युत पथदिव्यांची सोय अशा सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.‘किल्ल्याला ‘क’ दर्जा पर्यटनस्थळ घोषित करा’किल्ल्यावर मागील दहा वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई ही संस्था गडसंवर्धनाचे कार्य स्वखर्चाने करत आहे.संस्थेने आजपर्यंत दिशादर्शक फलक, तटबंदी, डागडुजी, पाणीटाक्यांची स्वच्छता, न्हाणवा मोहीम तसेच टोटल स्टेशन सर्व्हेसारख्या अत्याधुनिक मोजणी तंत्राचा वापर करून गडाचा नकाशा रेखाटन, वास्तुनिश्चिती करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.बोरवाडी परिसरातील या किल्ल्याला ‘क’ दर्जा पर्यटनस्थळ घोषित करण्यात यावे, तसेच मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

राज्य संरक्षित स्मारक घोषित1.शिवकाळात लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मानगडाचा रायगड प्राधिकरणामध्ये समावेश केल्यास तातडीने निधीचा विनियोग करता येईल, असे मत इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले आहे.2. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० नुसार १६ सप्टेंबर २०१६ रोजी मानगड किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक घोषित केले आहे.

3.तसेच अंतिम अधिसूचनेनुसार मौजे मशिदवाडी येथील ६.६९ हेक्टर क्षेत्रफळ संरक्षित करण्याविषयी राजपत्रात प्रसिद्धी करण्यात आली आहे.4. याच परिसरात भव्य शिवमंदिराचे भग्नावशेष, वीरगळ, सतीशिळा, समाधीशिळा, देवदेवतांची शिल्पे आदी अवशेष आहेत. त्यांचे जतन होण्यासाठी गावात वस्तुसंग्रहालय इमारत होणे गरजेचे आहे.