शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प; कोकणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:18 IST

पालकमंत्र्यांची माहिती : तातडीने मदत, बचाव कार्यासाठी ठरणार उपयुक्त

रायगड : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ पथकाचा बेस कॅम्प तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक प्रस्थापित करण्यासाठी मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्राद्वारे विनंती केली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोकणात सातत्याने विविध आपत्ती घडत असतात, शिवाय रायगड जिल्ह्यात उद्योगांचे जाळे पसरलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केमिकल कंपन्या अधिक प्रमाणात विखुरल्या आहेत. या ठिकाणी अपघातही घडलेले आहेत. जिल्ह्यातून मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा हे दोन राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कोकण रेल्वे जाते. कोकणात पर्यटकांचाही राबता असतो. त्यामुळे आपत्ती घडण्याचा धोका अधिक आहे. आपत्ती घडल्यानंतर तातडीने बचाव आणि मदत करण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे झाले होते. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अशी यंत्रणा उभारणे अतिशय गरजेचे झाले आहे.आपत्ती प्रसंगी वेळेत मिळणार मदतजिल्ह्यात आपत्ती घडल्यानंतर मुंबई, पुण्यातून येणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला बराच अवधी लागतो. आपत्तीच्या कालावधीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने, रायगडमध्येच सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे झाले होते. रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या पथकाचा बेस कॅम्प महाड येथे राहणार आहे. त्यामुळे तीनही जिल्ह्यात एखादी आपत्ती घडली, तरी कोकणासाठी महाडमधील एनडीआरएफचे पथक पहिले घटनास्थळी हजर होणार आहे.कोकणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयआपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी २७ ऑगस्ट रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलkonkanकोकण