शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

प्रदूषित शहरांत नवी मुंबई दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:19 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल : वायुप्रदूषणात वाढ, उपाययोजनांचा अभाव

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अलीकडेच जाहीर केलेल्या प्रदूषित शहरात माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षी प्रदूषित शहराच्या यादीत नवी मुंबई तिसºया स्थानावर होती. यावरून शहरातील वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले असून, या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे, तसेच प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

हवेतील वाढते प्रदूषण हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचा ºहास, शहरीकरणामुळे वाहनांची वाढती संख्या, विविध टप्प्यावर सुरू असलेली विकासकामे आदीमुळे हवेत धुळीचे कण पसरून वायुप्रदूषण होत असल्याचा जागतिक निष्कर्ष आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला येत आहे. शहरात विविध प्रकल्प होऊ घातले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी बंदराचा विस्तार आदीमुळे शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईलगत दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर हे दोन मार्ग शहराला विभागून जातात. या मार्गावरून लाखो वाहने जा-ये करतात.

तसेच तुर्भे येथील एपीएमसीच्या बाजारपेठेत दररोज हजारो ट्रक व टेम्पो येतात. या सर्वाचा परिणाम म्हणून वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खोकला, सर्दी, ताप तसेच श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या काळात केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई शहर राज्यातील तिसºया क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून जाहीर केले होते. नवी मुंबईतील हवेत पार्टिक्युलेट मॅटर १० चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० तर नायट्रोजन डायआॅक्साइड व कार्बनडाय आॅक्साइडचे सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्याने हे शहर प्रदूषित शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालयाने दिल्या होत्या; परंतु स्थानिक प्रशासनाकडून या सूचनांना केराची टोपली दाखविल्याने प्रदूषणाचा आलेख उंचावल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून नवी मुंबई आता राज्यात दुसºया क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून पुढे आली आहे.प्रदूषणकारी कारखान्यांना अभय : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत नवी मुंबईत आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. अनेक कारखान्यातून रात्रीच्या वेळी हवेत विषारी धूर सोडला जातो. जवळच्या नागरी वस्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या संदर्भात रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, थातूरमातूर उत्तर देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. एकूणच एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखान्यांना ‘अर्थ’पूर्ण अभय देण्याचे धोरणही शहराच्या स्वास्थ्यासाठी मारक ठरत असल्याचे दिसून आले आहे.

उपाययोजना कागदावरच : महापालिका व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत; परंतु मागील अनेक वर्षांपासून त्या कागदावरच सीमित राहिल्या आहेत. विशेषत: आवश्यक ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी केंद्र उभारणे, नागरिकांना पर्यावरणविषयी माहिती मिळावी यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी एलईडी दर्शक फलक लावण्याची योजना आहे. त्यापैकी काही ठिकाणी असे फलक लावलेही आहेत; परंतु प्रत्येक प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, त्यामुळे शहरातील प्रदूषणाचा विषय गंभीर होताना दिसत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई