शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:26 IST

राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

माणगाव : निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. काही तांत्रिक कारणे वगळता राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात १७ आॅगस्ट रोजी रायगड लोकसभा ३२ चे खासदार तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला. माणगांवचे पत्रकारांनी निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांच्या प्रश्ना संदभार्तील त्रूटी दुरुस्ती व न्याय मिळवून देण्यासाठी ७ सप्टेंबरला उपोषणास बसणार असल्याचे पत्र राज्याचे महसूलमंत्री, रायगडच्या पालकमंत्री व खासदार सुनिल तटकरे यांच्या नावे दिले असल्याने या पत्राचा खुलासा खासदारांनी पत्रकार परिषद बोलावून केला.तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सुमारे ९७ टक्के भरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले. व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी आपल्यापर्यंत कोणीही नुकसानग्रस्त घेऊन आल्यास पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे, असे आवहान खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे. यावेळी माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव, तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे, नायब तहसिलदार भाबड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी व विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.घरगुती वापराची भांडी वापराचे कपडे या ााठी हि काल परवा जिल्हाधिकारी याच्याकडे शासनाने फंड जमा झाल्याचे सांगून, पंचनाम्यात घरगुती भांडी व कपड्यानसाठी नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.>पंचनाम्यात चुका असतील तर प्रांत, तहसील कार्यालयात कळवामाणगाव तालुक्यातील बेलदर समाजाची घरे ही वनविभागाच्या जागेत असल्याने त्यांना शासन भरपाई देऊ शकत नाही. आदिवासी समाजाला मात्र वनविभागाची जागा कायद्यानुसार देतात, त्यामुळे वनविभागात राहणाºया आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई मदत दिल्याचे खा.तटकरे यांनी सांगितले. पंचनाम्यात जर काही चुका झाल्या असतील, तर संबंधित व्यक्तीचा अर्ज आणून प्रांत व तहसील कार्यालयात अधिकाºयांना दाखवावे. पंचनामा व आपल्याला मिळालेली शासन मदत यात काही तफावत असेल, तर दोन दिवसांत त्याचा निर्वाळा करून मिळेल, असेही तटकरे यांनी यावेळी बोलून प्रांत व तहसीलदारांना सूचना दिल्या.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे