शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:26 IST

राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

माणगाव : निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. काही तांत्रिक कारणे वगळता राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनात १७ आॅगस्ट रोजी रायगड लोकसभा ३२ चे खासदार तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या रक्कमेचा आढावा घेतला. माणगांवचे पत्रकारांनी निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांच्या प्रश्ना संदभार्तील त्रूटी दुरुस्ती व न्याय मिळवून देण्यासाठी ७ सप्टेंबरला उपोषणास बसणार असल्याचे पत्र राज्याचे महसूलमंत्री, रायगडच्या पालकमंत्री व खासदार सुनिल तटकरे यांच्या नावे दिले असल्याने या पत्राचा खुलासा खासदारांनी पत्रकार परिषद बोलावून केला.तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सुमारे ९७ टक्के भरपाई मदत खात्यात जमा झाली असल्याचे माणगांव तहसिलदार यांनी स्पष्ट केले. व काही मानवी चुकांमुळे पंचानाम्यात असलेल्या त्रुटी आपल्यापर्यंत कोणीही नुकसानग्रस्त घेऊन आल्यास पत्रकार बांधवानी संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊन मदत मिळवुन देऊन नुकसानग्रस्तांस सहकार्य करावे, असे आवहान खासदार तटकरे यांनी पत्रकार परीषदेत केले आहे. यावेळी माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर-जाधव, तहसिलदार प्रियांका आयरे- कांबळे, नायब तहसिलदार भाबड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव व तालुक्यातील विविध बँकाचे अधिकारी व विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.घरगुती वापराची भांडी वापराचे कपडे या ााठी हि काल परवा जिल्हाधिकारी याच्याकडे शासनाने फंड जमा झाल्याचे सांगून, पंचनाम्यात घरगुती भांडी व कपड्यानसाठी नुकसानग्रस्तांना आलेल्या वाढीव मदत रक्कम देखील खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे आदेश देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.>पंचनाम्यात चुका असतील तर प्रांत, तहसील कार्यालयात कळवामाणगाव तालुक्यातील बेलदर समाजाची घरे ही वनविभागाच्या जागेत असल्याने त्यांना शासन भरपाई देऊ शकत नाही. आदिवासी समाजाला मात्र वनविभागाची जागा कायद्यानुसार देतात, त्यामुळे वनविभागात राहणाºया आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई मदत दिल्याचे खा.तटकरे यांनी सांगितले. पंचनाम्यात जर काही चुका झाल्या असतील, तर संबंधित व्यक्तीचा अर्ज आणून प्रांत व तहसील कार्यालयात अधिकाºयांना दाखवावे. पंचनामा व आपल्याला मिळालेली शासन मदत यात काही तफावत असेल, तर दोन दिवसांत त्याचा निर्वाळा करून मिळेल, असेही तटकरे यांनी यावेळी बोलून प्रांत व तहसीलदारांना सूचना दिल्या.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे