शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

राष्ट्रीय महामार्ग वृक्षतोडीमुळे उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:00 IST

३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती.

नेरळ : नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या सदाहरित जंगल परिसरातील पेण-खोपोली राज्य महामार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. ३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती. यामुळे महामार्गावर शीतल हवेच्या झोतासह सावलीत प्रवास करताना प्रत्येक वाहनचालक व प्रवाशांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळत असे. मात्र, आता या महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूंना उभी असलेली वृक्षांच्या साखळीवर कुऱ्हाडीचे घाव घालून सर्रास वृक्षतोड सुरू झाली आहे. यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पेण, खालापूर, खोपोली ते अलिबाग तालुक्याचा मुंबई महानगर विकास प्राधिकरणात समावेश करण्यात आल्याने भविष्यातील येथील राहणीमान व औद्योगिक विकासाला पूरक अशा सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचे धोरण आहे. असे असले तरीही वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार जी जैवसाखळी उद्ध्वस्त होते, ती पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कित्येक वर्षे लागतात.

केंद्र व राज्य शासनाच्या विकास धोरणानुसार पेण महामार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे भविष्यात गतिमान अशी दळणवळण व्यवस्था तयार व्हावी यासाठी रस्ते, महामार्ग रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून जी वृक्षतोड सुरू झाली आहे ती रीतसर परवानग्या घेऊन केली जात आहे. मात्र, जी झाडे तोडली जातात त्यांच्या तिपटीने वृक्षलागवड करणे बंधनकारक असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात अशीच वृक्षतोड करण्यात आली होती. ते काम आता पेण-खोपोली महामार्गावर सुरू झाले आहे. यामुळे निसर्गसंपदेने नटलेल्या या महामार्गावरच्या सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे शीतल सावली मात्र हरवली जाणार असल्याने यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र