शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

...आणि खासदार सुनील तटकरे कार्यक्रम सोडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 06:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे खा. सुनील तटकरे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले.

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना राजशिष्टाचार पालन न झाल्याने आणि निमंत्रण असून भाषण करण्यास दिले नसल्याचे कारण देत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे यथायोग्य सन्मान केला असून, खासदार सुनील तटकरे यांचाही केला होता. मात्र, चांगल्या कार्यक्रमात गालबोट लावण्याची विरोधकांची परंपरा आहे. खासदार हे कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज याच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे किल्ले रायगडावर कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, मान्यवर यांनाही आमंत्रित केले होते. सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम होत असताना त्याचे स्वागताध्यक्ष हे त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार आहेत. मात्र, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांना करण्यात आले आहे. 

नियमांचे पालन केलेले नाहीशिवराज्यभिषेक सोहळ्याचे खासदार म्हणून सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मी एक शिवप्रेमी म्हणूनही कार्यक्रमास उपस्थित होताे. मात्र, कार्यक्रमात राज शिष्टाचार नियमांचे पालन न केल्याने आणि कार्यक्रम शासनाचा असताना काही जण स्वतः कार्यक्रम करीत असल्याचा आव आणत असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांना चांगल्या कामात विघ्न आणण्याची सवय आहे. कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे