शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...आणि खासदार सुनील तटकरे कार्यक्रम सोडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 06:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे खा. सुनील तटकरे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले.

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना राजशिष्टाचार पालन न झाल्याने आणि निमंत्रण असून भाषण करण्यास दिले नसल्याचे कारण देत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे यथायोग्य सन्मान केला असून, खासदार सुनील तटकरे यांचाही केला होता. मात्र, चांगल्या कार्यक्रमात गालबोट लावण्याची विरोधकांची परंपरा आहे. खासदार हे कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज याच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे किल्ले रायगडावर कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, मान्यवर यांनाही आमंत्रित केले होते. सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम होत असताना त्याचे स्वागताध्यक्ष हे त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार आहेत. मात्र, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांना करण्यात आले आहे. 

नियमांचे पालन केलेले नाहीशिवराज्यभिषेक सोहळ्याचे खासदार म्हणून सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मी एक शिवप्रेमी म्हणूनही कार्यक्रमास उपस्थित होताे. मात्र, कार्यक्रमात राज शिष्टाचार नियमांचे पालन न केल्याने आणि कार्यक्रम शासनाचा असताना काही जण स्वतः कार्यक्रम करीत असल्याचा आव आणत असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांना चांगल्या कामात विघ्न आणण्याची सवय आहे. कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे