शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...आणि खासदार सुनील तटकरे कार्यक्रम सोडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 06:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे खा. सुनील तटकरे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले.

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना राजशिष्टाचार पालन न झाल्याने आणि निमंत्रण असून भाषण करण्यास दिले नसल्याचे कारण देत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे यथायोग्य सन्मान केला असून, खासदार सुनील तटकरे यांचाही केला होता. मात्र, चांगल्या कार्यक्रमात गालबोट लावण्याची विरोधकांची परंपरा आहे. खासदार हे कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज याच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे किल्ले रायगडावर कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, मान्यवर यांनाही आमंत्रित केले होते. सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम होत असताना त्याचे स्वागताध्यक्ष हे त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार आहेत. मात्र, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांना करण्यात आले आहे. 

नियमांचे पालन केलेले नाहीशिवराज्यभिषेक सोहळ्याचे खासदार म्हणून सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मी एक शिवप्रेमी म्हणूनही कार्यक्रमास उपस्थित होताे. मात्र, कार्यक्रमात राज शिष्टाचार नियमांचे पालन न केल्याने आणि कार्यक्रम शासनाचा असताना काही जण स्वतः कार्यक्रम करीत असल्याचा आव आणत असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांना चांगल्या कामात विघ्न आणण्याची सवय आहे. कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे