शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मत्स्यशेतीतून पर्यटनाला चालना; खारेपाटात टाशीवरील रस्त्यांकरिता सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:57 PM

खारेपाटातील ‘टाशी’ अर्थात दोन शेतांमधील रस्तासदृश बांधाचे रूपांतर शासनाच्या ‘पाणंद रस्ते’ (शेतरस्ते) योजनेतून रस्त्यांमध्ये केल्यास पर्यटक मत्स्य तलावांपर्यंत पोहोचतील, तसेच तलावातील मासे बाजारपेठेत अल्पावधीत पोहोचतील.

- जयंत धुळपअलिबाग : खारेपाटातील ‘टाशी’ अर्थात दोन शेतांमधील रस्तासदृश बांधाचे रूपांतर शासनाच्या ‘पाणंद रस्ते’ (शेतरस्ते) योजनेतून रस्त्यांमध्ये केल्यास पर्यटक मत्स्य तलावांपर्यंत पोहोचतील, तसेच तलावातील मासे बाजारपेठेत अल्पावधीत पोहोचतील. त्यामुळे परिसरात समृद्धी येऊ शकते, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खारेपाटातील शेतकरी शिष्टमंडळाबरोबरच्या चर्चेत व्यक्त केला.खारेपाटातील शहापूर-धेरंड गावातील पारंपरिक तलावात जिताडा मत्स्यशेती हा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे. ही मत्स्यशेती पर्यटन व्यवसायाशी जोडली, तर ‘जिताडा व्हिलेज’ ही आधुनिक आणि स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार देणारी अनोखी संकल्पना ठरेल. त्यासाठी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना चर्चेकरिता निमंत्रित केले होते. श्रमिक मुक्ती दलाचे समन्वयक ए.जी. पाटील, तामिळनाडूमधील केंद्र सरकारच्या राजीव गांधी सेंटर फॉर अ‍ॅक्वाकल्चर या संस्थेतून खेकडा संवर्धन विषयक प्रशिक्षण घेऊन आलेले किरण पाटील, सुधीर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.जिताडा माशांबरोबरच कांदळवन क्षेत्रात खेकडा संवर्धनाकरिता अत्यंत पोषक परिस्थिती आहे. त्यातून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. खेकड्याला देशाबरोबरच परदेशात मोठी मागणी असून, त्यांतून परकीय चलन उपलब्ध होऊ शकते. तामिळनाडूमधील खेकडा संवर्धन आणि विक्री व्यवसाय देशात अव्वल आहे. संपूर्ण कोकणात खेकडा संवर्धनातून आमूलाग्र आर्थिक क्रांती होऊन शेतकरी सधन होऊ शकतो, अशी भूमिका या वेळी किरण पाटील यांनी मांडली. त्यास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन खारेपाटाकरिता खेकडा संवर्धन व विक्री प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मोत्याच्या शिंपल्यांचे देखील संवर्धन होऊ शकते, त्या बाबतच्या शक्यता तपासण्याच्या सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी खारेपाटातील शेतकºयांना चर्चेकरिता आमंत्रित केले. जिताडा व्हिलेज सारख्या संकल्पनेला पर्यटनाची जोड देऊन, शेतकºयांच्या व्यवसायवृद्धीसाठी सुचवलेल्या पर्यायांमुळे शेतकºयांचा उत्साह वृद्धिंगत झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे. व्यवसायवृद्धीसाठी खारेपाटात टाशीवरील रस्त्यांकरिता शेतकरी सुधीर पाटील यांनी शहापूर-धेरंड गावांच्या खारेपाटातील टाशींचे सर्वेक्षण सहकारी शेतकºयांच्या मदतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू केले आहे.जलव्यवस्थापनाचा नवा प्रस्ताव : खारेपाटातील बांधावरचा भाजीपाला आणि तलावातील मत्स्यशेती कायमस्वरूपी होण्यासाठी शाश्वत जलव्यवस्थापनाचा नवा प्रस्ताव शेतकºयांशी चर्चा करून श्रमिक मुक्ती दल तयार करीत आहे. हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर करण्यात येणार असल्याचे भगत यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड