शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

जेट्टीबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:32 AM

प्रकाश सरपाटील यांचा इशारा : मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करण्याची मागणी

आगरदांडा : मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्के ट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरुड, एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नसल्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोईस्कर असा धक्का असल्याने मुंबईचा बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन महिन्यांसाठी आगरदांडा येथे मच्छीमारांना जेट्टी उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करून जेट्टी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशारा मुरुड तालुका नाखवा संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुरुड शहरातील जय मल्हार महादेव कोळी समाजगृहामध्ये पत्रकास परिषद घेण्यात आली होती. यावेळी सर्व पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना प्रकाश सरपाटील बोलत होते. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सहापेक्षा जास्त जेट्ट्या आहेत. आगरदांडा येथे तीन जेट्ट्या असून, त्यातील कोणतीही एक जेट्टी मच्छीमारांना दिल्यास आमचे काम सुकर होणार आहे. मुंबईचे व्यापारी आगरदांडा येथे येण्यास तयार आहेत, परंतु बोटी बंदराला लावून न दिल्यामुळे आमचा माल फुकट जात आहे. व्यापारी आले, तर रोख स्वरूपात व्यवहार झाल्याने क्रयशक्ती वाढणार आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, आमच्या या आंदोलनास तालुक्यातील असंख्य मच्छीमार सोसायट्यांचा पाठिंबा असून, ज्यावेळी आम्ही आंदोलन करू, त्यावेळी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आगरदांडा इंदापूर या चौपदरी रस्त्यामुळे मुंबई अंतर जवळ झाले असून, मासळीचे घाऊक खरेदीदार येथे येण्यास उत्सुक आहेत. यावेळी जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेरमन महेंद्र गार्डी, माहेश्वरी मच्छीमार सोसायटीचे चेरमन धुव्र लोदी, दामोदर बैले आदी मान्यवर उपस्थित होते.आगरदांडा येथील तीनपैकी एक जेट्टी द्यावी

आगरदांडा जेट्टी प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. मच्छीमार बांधव शांत बसणार नाही. प्रवासी जेट्टीमुळे आम्हाला जेट्टी देता येत नाही, असे मेरिटाइम बोर्डाचे म्हणणे असेल, तरी आगरदांडा येथील तीनपैकी कोणतीही एका जेट्टीची मागणी करीत आहोत. तीन जेट्टींपैकी दोन जेट्टींचा वापर होत आहे. एक जेट्टी मच्छीमारांना देण्यास काय हरकत आहे. आम्ही या संदर्भात मत्स्य विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्याशीही संपर्क साधत आहोत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मंत्री क्वारंटाइन असल्याने संपर्क झाला नाही, असे सरपाटील म्हणाले.२५ कोटींच्या उलाढालीचा दावा : एकदरा, राजपुरी, दिघी व मुरुड परिसरातील सुमारे दोनशे होड्या मोठ्या स्वरूपात मासळी घेऊन आल्याने महिन्याला सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा दावा यावेळी सरपाटील यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिक मच्छीमारांनाच होणार असल्याचे स्पष्ट के ले.

टॅग्स :RaigadरायगडFishermanमच्छीमार