शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई-गोवा महामार्गावर माती भरावाचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:43 IST

वाहनधारकांना होणार मनस्ताप : मुसळधार पाऊस झाल्यास पसरणार चिखलाचे साम्राज्य

पेण : मुुुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदार कंपनीतर्फे पेण परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे रेखाटन केलेले आहे त्या ठिकाणच्या पुलाजवळील तब्बल एक किमी लांबीचा मातीच्या भरावाचे डोंगर उभे राहिले आहेत. पेण भोगावती पूल ते रामवाडी रेल्वे पूल या ठिकाणी उंच अशा डोंगराशी स्पर्धा करणारे मातीचे भराव केल्याने पाऊस पडल्यास सरींचा वर्षाव होवून भरावातील माती पाण्याच्या प्रवाहासोबत महामार्गावर पसरून चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. या चिखलामुळे प्रवासी वाहने व खाजगी वाहनचालकांना मोठा मनस्ताप होवून प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

येत्या बुधवारी हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे महामार्गावर या ठिकाणी संभाव्य धोका ओळखून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ही नागरिकांचे व प्रवाशांचे म्हणणे आहे.२०१० पासून ते २०१९ पर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अतिशय मंद गतीने सुरू असणाºया या कामाला प्रारंभ होवून ८ ते १० वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही आज हे काम मंदगतीने सुरूच आहे. या कामातील गती पाहता आणखी दोन वर्षे तरी काम पूर्ण होईल असे चित्र दिसत नाही.रस्त्यावर डोंगराइतके उंच मातीचे भरावाचे ढीग उभे राहिल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था जुन्या रस्त्यावरून अतिशय संथ गतीने सुरू आहे. पेण परिसरात तरणखोप, भोगावती पूल, अंतोरा फाटा, रेल्वे स्थानक, रामवाडी पूल ते समर्थनगर हा एक किमी लांबीचा राष्टÑीय महामार्गाचा टप्पा जागोजागी उंच अशा मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस उंच ढीग उभे केल्याने मान्सूनच्या पहिल्या प्रवासात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजणार आहेत.पहिल्याच पावसात महामार्गावर वाहतूक कोंडीचे संकट ओढवणार आहे. कारण या मातीच्या भरावावर पावसाचे पाणी पडून पाण्याच्या प्रवाहासोबत होणारी मातीची धूप आणि पसरणारा चिखल यामुळे महामार्ग ठप्प होण्याची लक्षणे सध्या रुंदीकरणाच्या कामामुळे दिसू लागली आहे. याबाबत पोलीस वाहतूक यंत्रणेला सुद्धा मोठा मनस्ताप होणार असून प्रारंभीचा पाऊस धुवाधार झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्यप्राय व नियंत्रणाबाहेर जाणार असल्याचे संभाव्य चित्र दिसत आहे.पेण तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुद्धा याबाबीचा अभ्यास न करता दुर्लक्ष केल्याने येत्या पावसाच्या आगमनाबोबरच येणाºया संकटाचा मुकाबला करण्याइतपतची यंत्रणसामुग्री व मनुष्यबळ यांची जमवाजमव करणे अशक्यप्राय होणार असल्याचे चित्र ही दिसत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने किनारपट्टी भागात ३००किमी लांब व या दाबाचा प्रभाव आहे. या दाबामुळे त्याचे बुधवारपर्यंत वादळात रुपांतर होणार असल्याने समुद्रधुनीतील वादळी वारे रायगडातील समुद्रकिनारपट्टीत हमखास घोंगावणार असल्याने त्यासोबत पावसाचे ही धूमधडाक्यात आगमन होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजात वर्तविले आहे. सुरुवातीचा पाऊस मुसळधार पडला तर महामार्गावर उभे केलेले मातीचे भरावाचे डोंगरासारखे ढीग या पावसात चिंब भिजून पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर पसरून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना न केल्यास हमरापूर फाटा ते वडखळपर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना व या संकटाचा संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याबाबतीत सर्वेक्षण करून तातडीने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई