शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

मुंबई-गोवा महामार्गावर माती भरावाचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:43 IST

वाहनधारकांना होणार मनस्ताप : मुसळधार पाऊस झाल्यास पसरणार चिखलाचे साम्राज्य

पेण : मुुुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदार कंपनीतर्फे पेण परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे रेखाटन केलेले आहे त्या ठिकाणच्या पुलाजवळील तब्बल एक किमी लांबीचा मातीच्या भरावाचे डोंगर उभे राहिले आहेत. पेण भोगावती पूल ते रामवाडी रेल्वे पूल या ठिकाणी उंच अशा डोंगराशी स्पर्धा करणारे मातीचे भराव केल्याने पाऊस पडल्यास सरींचा वर्षाव होवून भरावातील माती पाण्याच्या प्रवाहासोबत महामार्गावर पसरून चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. या चिखलामुळे प्रवासी वाहने व खाजगी वाहनचालकांना मोठा मनस्ताप होवून प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

येत्या बुधवारी हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे महामार्गावर या ठिकाणी संभाव्य धोका ओळखून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ही नागरिकांचे व प्रवाशांचे म्हणणे आहे.२०१० पासून ते २०१९ पर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अतिशय मंद गतीने सुरू असणाºया या कामाला प्रारंभ होवून ८ ते १० वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही आज हे काम मंदगतीने सुरूच आहे. या कामातील गती पाहता आणखी दोन वर्षे तरी काम पूर्ण होईल असे चित्र दिसत नाही.रस्त्यावर डोंगराइतके उंच मातीचे भरावाचे ढीग उभे राहिल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था जुन्या रस्त्यावरून अतिशय संथ गतीने सुरू आहे. पेण परिसरात तरणखोप, भोगावती पूल, अंतोरा फाटा, रेल्वे स्थानक, रामवाडी पूल ते समर्थनगर हा एक किमी लांबीचा राष्टÑीय महामार्गाचा टप्पा जागोजागी उंच अशा मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस उंच ढीग उभे केल्याने मान्सूनच्या पहिल्या प्रवासात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजणार आहेत.पहिल्याच पावसात महामार्गावर वाहतूक कोंडीचे संकट ओढवणार आहे. कारण या मातीच्या भरावावर पावसाचे पाणी पडून पाण्याच्या प्रवाहासोबत होणारी मातीची धूप आणि पसरणारा चिखल यामुळे महामार्ग ठप्प होण्याची लक्षणे सध्या रुंदीकरणाच्या कामामुळे दिसू लागली आहे. याबाबत पोलीस वाहतूक यंत्रणेला सुद्धा मोठा मनस्ताप होणार असून प्रारंभीचा पाऊस धुवाधार झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्यप्राय व नियंत्रणाबाहेर जाणार असल्याचे संभाव्य चित्र दिसत आहे.पेण तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुद्धा याबाबीचा अभ्यास न करता दुर्लक्ष केल्याने येत्या पावसाच्या आगमनाबोबरच येणाºया संकटाचा मुकाबला करण्याइतपतची यंत्रणसामुग्री व मनुष्यबळ यांची जमवाजमव करणे अशक्यप्राय होणार असल्याचे चित्र ही दिसत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने किनारपट्टी भागात ३००किमी लांब व या दाबाचा प्रभाव आहे. या दाबामुळे त्याचे बुधवारपर्यंत वादळात रुपांतर होणार असल्याने समुद्रधुनीतील वादळी वारे रायगडातील समुद्रकिनारपट्टीत हमखास घोंगावणार असल्याने त्यासोबत पावसाचे ही धूमधडाक्यात आगमन होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजात वर्तविले आहे. सुरुवातीचा पाऊस मुसळधार पडला तर महामार्गावर उभे केलेले मातीचे भरावाचे डोंगरासारखे ढीग या पावसात चिंब भिजून पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर पसरून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना न केल्यास हमरापूर फाटा ते वडखळपर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना व या संकटाचा संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याबाबतीत सर्वेक्षण करून तातडीने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई