शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, हार्दिक पटेलची जहाल टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:45 IST

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान

रायगड - मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला दोन कोटी रोजगार द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. आज शेतकऱ्याचा मुलगा कष्टाने परीक्षेत अधिक मार्क मिळवतो. पण, त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. आज देशातील शिक्षणव्यवस्था आणि रोजगार यांची अवस्था अशी बनलीय, जणू देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी सरकारवर जहाल टीका केली. 

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान बनविण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. आरक्षण लागू केलं, त्यावेळी त्यांनीही ज्या समाजाची संख्या अधिक त्या समाजाला तेवढा वाटा मिळेल असं म्हटल्याचे हार्दिक यांनी सांगितले. जिसकी जितनी संख्यादारी, उसकी उतनी भागिदारी, जोपर्यंत हे गणित लागू होत नाही. तोपर्यंत कुणालाही बरोबरीचा वाटा या देशात मिळणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं असावं हे जगाला दाखवून दिलयं. पण, आताचे शासन कसं वागतयं हे आपल्याला माहितच आहे. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, या समाजाला आरक्षण का पाहिजे, याचा अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले. तसेच, जे लोक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही करत नाहीत, ते लोक महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत, असे म्हणत हार्दिक यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGovernmentसरकारreservationआरक्षणmaratha mahasanghमराठा महासंघ