शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, हार्दिक पटेलची जहाल टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:45 IST

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान

रायगड - मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला दोन कोटी रोजगार द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. आज शेतकऱ्याचा मुलगा कष्टाने परीक्षेत अधिक मार्क मिळवतो. पण, त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. आज देशातील शिक्षणव्यवस्था आणि रोजगार यांची अवस्था अशी बनलीय, जणू देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी सरकारवर जहाल टीका केली. 

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान बनविण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. आरक्षण लागू केलं, त्यावेळी त्यांनीही ज्या समाजाची संख्या अधिक त्या समाजाला तेवढा वाटा मिळेल असं म्हटल्याचे हार्दिक यांनी सांगितले. जिसकी जितनी संख्यादारी, उसकी उतनी भागिदारी, जोपर्यंत हे गणित लागू होत नाही. तोपर्यंत कुणालाही बरोबरीचा वाटा या देशात मिळणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं असावं हे जगाला दाखवून दिलयं. पण, आताचे शासन कसं वागतयं हे आपल्याला माहितच आहे. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, या समाजाला आरक्षण का पाहिजे, याचा अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले. तसेच, जे लोक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही करत नाहीत, ते लोक महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत, असे म्हणत हार्दिक यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGovernmentसरकारreservationआरक्षणmaratha mahasanghमराठा महासंघ