शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

चिरनेर सत्याग्रहाचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:31 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला.

- मधुकर ठाकूरउरण  - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला. यात आठ आंदोलनकर्त्यांना हौतात्म्य आले. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात, यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळ गावी सरकारने स्मारके उभारली आहेत. चिरनेर येथे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हुतात्म्यांना शासकीय इतबारे आदरांजली वाहिली जाते. मंगळवारी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन संपन्न होणार आहे.स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० मध्ये जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. चिरनेर सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्रातील १९३०-३३ च्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे उपख्यान मानले जाते. शांततामय रीतीने सुरू असलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात शेतकरी,आगरी,आदिवासी असे सुमारे सहा हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील तरुणांचा सहभाग मोठा होता. आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट केला. गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले, तर ३८ आंदोलक जखमी झाले. जखमी आंदोलकांना कायमचे अपंगत्व आले. म्हणूनच स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्र माप्रसंगी अतिथी म्हणून मावळचे खा. श्रीरंग बारणे, सिडको महामंडळ अध्यक्ष तथा आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील, म्हाडाचे बाळासाहेब पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. अनिकेत तटकरे, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, आस्वाद पाटील, प्रमोद पाटील, उमा मुंडे, नारायण डामसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सरकारने आठ हुताम्यांची स्मारकेमूळ गावांमध्ये उभारलीलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी ( चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई ), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली),परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात त्यांच्याच मूळ गावी उभारली आहेत. अशा या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे आयोजित केला जातो. यावेळी शासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदनाही दिली जाते. येत्या २५ सप्टेंबर रोजीही चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड