शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्नण समीतीची ७ एप्रिल रोजी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 19:27 IST

 पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

-  जयंत धुळप 

रायगड -  पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ गावांचा प्रदेश संवेदनशील 

भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या दि.४ फेब्रुवारी २००३च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही अंशत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक पुर्ण  व १९ अंशत: अशी एकूण २० ,खालापूर तालुक्यातील अंशत: १०,पनवेल तालुक्यातील पुर्ण दोन व अंशत: ३८ अशी एकूण-४०,आणि ठाणे जिल्हयातील अंबरनाथ तालुक्यातील अंशत: १९ अशा एकूण ८९ गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. 

वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय सनियंत्नण समीती 

भारत सरकारच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये, सेवा निवृत्त सनदी अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ सदस्यांची सनियंत्नण समीती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून रायगड जिल्हाधिकारी हे या समीतीचे सदस्य सचिव आहेत. या समीतीची दुसरी बैठक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरान मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रमगृहात आयोजित करण्यांत आली आहे.

विकास प्रस्ताव बैठकीच्या पाच दिवस आधी पोहोचणे आवश्यक

या गावामधील संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्नात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री या कामांना सनियंत्नण समीतीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या समीतीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी त्यांचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडे सपूर्द करावेत.असे तक्रार अर्ज सनियंत्नण समीतीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या कामासाठी सनियंत्नण समीतीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्नण समीती यांच्याकडे सनियंत्नण समीतीच्या बैठकीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड