शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

जातींच्या दाखल्याबाबत ठोस निर्णय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:23 AM

तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीमधील कोळी समाजातील व्यक्तींकडे असणाºया अनुसूचित जमातीचे दाखले अवैध ठरवले जात असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही

अलिबाग : तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीमधील कोळी समाजातील व्यक्तींकडे असणाºया अनुसूचित जमातीचे दाखले अवैध ठरवले जात असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. लोकशाहीचा मूळ उद्देशच सफल होत नसल्याने तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनासह राज्यकर्त्यांना जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जातींच्या दाखल्याबाबत ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे खरे ठरवल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची ही दुसरी घटना ठरणार आहे.नवगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीचे सात, नागरिकांचा मागास प्रवर्गचे तीन आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक असे एकूण ११ सदस्य निवडून द्यायचे असतात. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची (हिंदू महादेव कोळी) येथे लोकसंख्या जास्त असल्यामुळे साहजिकच त्यांच्या प्रवर्गाच्या प्रतिनिधींची संख्या जास्त आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये मोडणाºया कोळी समाजातील लोकांकडे अनुसूचित जमातीचे दाखले आहेत, परंतु जात पडताळणीच्या वेळी हे दाखले अवैध ठरवले जातात. त्यामुळे निवडणुकीचा काहीच उपयोग होत नाही. कोळी समाजातील १९५० पूर्वीचे पूर्वज अथवा हयात असलेल्या व्यक्ती या शिक्षित नाहीत. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे सादर करता येत नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांनी निवडणूक लढवली, तरी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पुरावेच नसल्याने त्यांचे दाखले अवैध ठरवले जातात. त्यानंतर त्याचे ग्रामपंचायतीमधील सदस्यत्व रद्द होते. ३ नोव्हेंबर २००७ साली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळी सरपंचपदी बसलेल्या सदस्याचे जातीचे दाखले अवैध ठरवले होते. त्यामुळे त्याचा कारभार १५ मे २०१० पर्यंत उपसरपंचांनी चालवला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीवर १८ मे २०१० रोजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.त्यानंतर २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकच पाहत आहे.