शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:03 IST

७८ पैकी ७ उमेदवार जाणार विधानसभेवर; कोण जिंकणार, कोण आपटणार? याचीच चर्चा

अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार आहे. मतपेटी फुटल्यावर कोण आपटणार आणि कोण विजयी मिरवणूक काढणार? याकडेच सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवात होणार आहे.

अलिबाग, उरण, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये कडवी झुंज झाल्याने येथील निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. ७८ उमेदवारांपैकी सात उमेदवारांना विधानसभेचा दरवाजा उघडला जाणार आहे. प्रशासनाने निकालासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे.२०१४ मध्ये मतदानाची टक्केवारी आणि २०१९ मध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता तब्बल पाच टक्क्यांची घट दिसून येते. या घटलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणेही उत्सुकतचे आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यामध्येच लढत झाली. दोन्हीकडील समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरी मुरुड तालुक्यातील मतदार आणि काँग्रेसने घेतलेली भूमिका कोणाच्या पथ्यावर पडणार, यावरच विजयी उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. मतदारसंघामध्ये शिवसेनेची जोरदार हवा झाली होती; परंतु शेकापमधील सर्व धुरंदर नेते हे राजकारणात माहीर आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघात निवडणुकीत खेळलेले राजकारण उमेदवाराला विजयी करणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

पेण विधानसभा मतदारसंघात शेकापचे धैर्यशील पाटील आणि भाजपचे रवींद्र पाटील यांच्यात लढत झाली आहे. शेकापकडे असलेले पारंपरिक मतदार हे जमेची बाजू आहे, तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती. रवींद्र पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काँग्रेसची किती मते वळली, हे आताच सांगता येणार नाही. या ठिकाणी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने काँग्रेसला मानणारा मतदार हा काँग्रेसकडेच राहणार आहे. युतीमधील शिवसेनेची ताकद विजयासाठी रवींद्र पाटील यांच्या मागे उभी होती का हे निकालानंतरच कळणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुरंगीच लढत होणार होती. शिवसेनेचे भरत गोगावले यांना भाजपचे बळ तर काँग्रेसचे माणिक जगताप यांच्या पाठीशी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत खरेच झाली का, हेही गुरुवारी स्पष्ट होणार आहे.श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यापाठीशी त्याचे वडील खासदार सुनील तटकरे उभे होते. तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचे हात भाजपने मजबूत केले का हे निकालानंतर स्पष्ट होईल.

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी उमेदवारांना आधीच विजयी करून टाकले आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी भाजपची साथ होती का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि हनुमंत पिंगळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

उरण मतदारसंघामध्ये मात्र सर्वात कडवी झुंज आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले. त्यामुळे त्यांच्यात मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. शेकापचे विवेक पाटील हे शेकापकडून लढले आहेत. त्यांचा पारंपरिक मतदार हा लाल बावट्याच्या छायेखालीच राहणारा आहे. त्यामुळे येथे विजयासाठी चांगलीच चुरस आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनेही अ‍ॅड. राकेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. आगरी-कोळी मतदारांना एकत्र करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून या विभागात सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरेश केणी यांच्यातच दुरंगी सामना झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ठाकूर यांच्या विरोधात नवखा उमेदवार दिल्याने तो कितपत ठाकूर यांच्या पुढे टिकला हे गुरुवारी दुपारपर्यंत कळणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानalibag-acअलिबागuran-acउरणpen-acपेणshrivardhan-acश्रीवर्धनkarjat-acकर्जतmahad-acमहाड