शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Maharashtra Election 2019 : युतीमधील बंडखोरी टळली, उरण मतदारसंघातील पेच मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 03:06 IST

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांसमोर उमेदवार न देण्याची सामंज्यस्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीमधील संभाव्य बंडखोरी टळली आहे. मात्र, उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेची अडचण कायम असल्याचे दिसते. रातोरात असे नेमके काय घडले, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजपचे बंडखोर उमेदवार अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत या ठिकाणी उभे राहण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेने पेण विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची बुधवारी घोषणा केल्याने वरिष्ठ पातळीवरील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन परस्परांना आव्हान उभे राहील, असे काहीच करायचे नसल्याचे ठरले. त्याबाबतचा संदेश त्या-त्या पातळीवरून जिल्हा पातळीवरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना यश आल्याचे बोलले जाते. मात्र, दोन्ही पक्षातील बंडखोर मनोमिलन झाल्याचे सांगत असले, तरी ते प्रामाणिकपणे काम करणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संभाव्य दगाफटक्याची टांगती तलवार भाजपसह सेनेच्या उमेदवारांवर राहणार असल्याचे बोलेले जाते.उरण मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, हे आता ७ आॅक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे. अलिबागमधून भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हे इच्छुक असल्याने ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; परंतु वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने त्यांची भूमिका रातोरात बदली. गुरुवारी शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अ‍ॅड. मोहिते आणि भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या ठिकाणी शेकापचे सुभाष पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर अथवा राजा ठाकूर लढत पाहायला मिळणार आहे.पेणमध्ये सरळ लढत१श्रीवर्धनमध्येही भाजपचे कृष्णा कोबनाक यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यात सामना रंगणार आहे, तसेच पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांच्या विरोधात शेकापचे धैर्यशील पाटील यांच्यात सरळ लढत होणे अपेक्षित आहे.२कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात रंगतदार लढत अनुभवता येणार आहे. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले विरुद्ध काँग्रेसचे माणिक जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरिश केणी अशी लढत होणार आहे.३भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टळणार आहे; परंतु बोहल्यावर चढवलेल्यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मनापासून काम करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड