शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Mahad Building Collapse: ‘त्या’ रहिवाशांना न्याय मिळेल का?; ४१ सदनिकाधारकांचे लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:28 IST

महाडमधील दुर्घटना : बेघर झाल्याने संकट

दासगाव : महाडमधील तारिक गार्डन ही इमारत कोसळली आणि नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींच्या बांधकाम गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाडमधील या दुर्घटनेत १६ जणांचा निष्पाप जीव गेला. शिवाय ४१ सदनिकाधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सदनिकाधारकांना शासनस्तरावर न्याय मिळेल का, असा प्रश्न समोर येत आहे.

महाडमधील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत अवघ्या ७ वर्षांत पत्त्याप्रमाणे कोसळली. यामध्ये ४१ सदनिका होत्या. अनेकांनी रोजीरोटीची पुंजी या घरासाठी लावली होती. आपले कुटुंब शहरात राहून मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहत काहींनी तारिक गार्डनमध्ये घरे घेतली होती. मात्र, या सर्वांची स्वप्ने या दुर्घटनेने भंग झाली. शासनानेही मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना पैसे मंजूर केले. मात्र, बेघर झालेल्या या लोकांना पुन्हा घर मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारत कोसळल्याने ज्यांनी घर म्हणून लाखो रुपये मोजून या सदनिका घेतल्या, त्या सदनिका या दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्या आणि मोकळी जागा निर्माण झाली. जागा मात्र मूळ मालकाच्या नावावर राहिली. मात्र, सदनिका निघून गेल्याने सदनिकाधारक बेघर झाले आहेत.सदनिकाधारकांचे पुनर्वसन होणार का?महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर अनेक प्रश्नचिन्हे समोर आली आहेत. तारिक गार्डनच्या बिल्डर, आर.सी.सी. कन्सल्टंट, पालिका मुख्याधिकारी, अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांत हे अटकही होतील. मात्र, ज्या सदनिकाधारकांनी आपल्या मेहनतीतून सदनिका खरेदी केल्या होत्या, त्या सदनिकाधारकांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. या सदनिकाधारकांचे शासन पुनर्वसन करणार का? असा प्रश्नही समोर आहे. ज्या जागेवर ही इमारत होती, त्या जागेचा प्रश्नही आता सदनिकाधारक उपस्थित करत आहेत. शासन नियमानुसार सदनिकाधारकांची सोसायटी आणि अभिहस्तांतरण झाले होते का? याबाबतही चौकशी करून जागेची मालकी ठरविली जाईल.मूळ इमारतीमध्ये होणारे बदल थांबले पाहिजेतइमारतींना पालिका परवानगी देताना शासन नियमानुसार देते. मात्र, अनेक जण इमारत बांधकाम झाल्यानंतर यामध्ये बदल करतात. पार्किंगमधील बांधकामे, टेरेसवर बांधकाम, दुकान गाळ्यात बदल, यामुळे इमारतीच्या मूळ आकारात बदल होत जातात. ही बांधकामे अनधिकृत ठरवली जातात. मात्र, अनधिकृत बांधकाम आहे, तसेच ठेवले जाते. पालिकेच्या यादीत अशा अनधिकृत बांधकामांची नावे वाढत जातात. मात्र, कारवाई शून्य.अनेक इमारतींच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवरमहाड शहराचा विस्तार वाढू लागला आहे. यामुळे नव्याने अनेक इमारती कमी कालावधीत उभ्या राहत आहेत. वारेमाप परवानग्या दिल्या जात असल्याने, बाहेरील बिल्डरही इमारती उभ्या करण्यास पुढे येत आहेत. गेल्या काही वर्षांत महाड शहरात विविध भागात उभ्या राहिलेल्या इमारतींपैकी काही इमारतींचे पिलर खचणे, पिलरवरील सिमेंट आवरण निघून जाणे, अशा घटना समोर आल्या आहेत.याबाबत महाड नगरपालिकेकडे तक्रारीही झाल्या आहेत. आजही याच इमारतींमधून हे नागरिक राहत आहेत. शहरात अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींना महाड नगरपालिकेने धोकादायक इमारती ठरवून नागरिकांना येथून स्थलांतर होण्याचे आदेश दिले आहेत. तारिक गार्डन दुर्घटनेनंतर या इमारतीमधील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना