शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Mahad Building Collapse: ‘त्या’ रहिवाशांना न्याय मिळेल का?; ४१ सदनिकाधारकांचे लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:28 IST

महाडमधील दुर्घटना : बेघर झाल्याने संकट

दासगाव : महाडमधील तारिक गार्डन ही इमारत कोसळली आणि नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींच्या बांधकाम गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाडमधील या दुर्घटनेत १६ जणांचा निष्पाप जीव गेला. शिवाय ४१ सदनिकाधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सदनिकाधारकांना शासनस्तरावर न्याय मिळेल का, असा प्रश्न समोर येत आहे.

महाडमधील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही इमारत अवघ्या ७ वर्षांत पत्त्याप्रमाणे कोसळली. यामध्ये ४१ सदनिका होत्या. अनेकांनी रोजीरोटीची पुंजी या घरासाठी लावली होती. आपले कुटुंब शहरात राहून मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहत काहींनी तारिक गार्डनमध्ये घरे घेतली होती. मात्र, या सर्वांची स्वप्ने या दुर्घटनेने भंग झाली. शासनानेही मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना पैसे मंजूर केले. मात्र, बेघर झालेल्या या लोकांना पुन्हा घर मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारत कोसळल्याने ज्यांनी घर म्हणून लाखो रुपये मोजून या सदनिका घेतल्या, त्या सदनिका या दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्या आणि मोकळी जागा निर्माण झाली. जागा मात्र मूळ मालकाच्या नावावर राहिली. मात्र, सदनिका निघून गेल्याने सदनिकाधारक बेघर झाले आहेत.सदनिकाधारकांचे पुनर्वसन होणार का?महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळल्यानंतर अनेक प्रश्नचिन्हे समोर आली आहेत. तारिक गार्डनच्या बिल्डर, आर.सी.सी. कन्सल्टंट, पालिका मुख्याधिकारी, अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांत हे अटकही होतील. मात्र, ज्या सदनिकाधारकांनी आपल्या मेहनतीतून सदनिका खरेदी केल्या होत्या, त्या सदनिकाधारकांचे घराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. या सदनिकाधारकांचे शासन पुनर्वसन करणार का? असा प्रश्नही समोर आहे. ज्या जागेवर ही इमारत होती, त्या जागेचा प्रश्नही आता सदनिकाधारक उपस्थित करत आहेत. शासन नियमानुसार सदनिकाधारकांची सोसायटी आणि अभिहस्तांतरण झाले होते का? याबाबतही चौकशी करून जागेची मालकी ठरविली जाईल.मूळ इमारतीमध्ये होणारे बदल थांबले पाहिजेतइमारतींना पालिका परवानगी देताना शासन नियमानुसार देते. मात्र, अनेक जण इमारत बांधकाम झाल्यानंतर यामध्ये बदल करतात. पार्किंगमधील बांधकामे, टेरेसवर बांधकाम, दुकान गाळ्यात बदल, यामुळे इमारतीच्या मूळ आकारात बदल होत जातात. ही बांधकामे अनधिकृत ठरवली जातात. मात्र, अनधिकृत बांधकाम आहे, तसेच ठेवले जाते. पालिकेच्या यादीत अशा अनधिकृत बांधकामांची नावे वाढत जातात. मात्र, कारवाई शून्य.अनेक इमारतींच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवरमहाड शहराचा विस्तार वाढू लागला आहे. यामुळे नव्याने अनेक इमारती कमी कालावधीत उभ्या राहत आहेत. वारेमाप परवानग्या दिल्या जात असल्याने, बाहेरील बिल्डरही इमारती उभ्या करण्यास पुढे येत आहेत. गेल्या काही वर्षांत महाड शहरात विविध भागात उभ्या राहिलेल्या इमारतींपैकी काही इमारतींचे पिलर खचणे, पिलरवरील सिमेंट आवरण निघून जाणे, अशा घटना समोर आल्या आहेत.याबाबत महाड नगरपालिकेकडे तक्रारीही झाल्या आहेत. आजही याच इमारतींमधून हे नागरिक राहत आहेत. शहरात अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींना महाड नगरपालिकेने धोकादायक इमारती ठरवून नागरिकांना येथून स्थलांतर होण्याचे आदेश दिले आहेत. तारिक गार्डन दुर्घटनेनंतर या इमारतीमधील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना