शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 23:38 IST

घरच उद्ध्वस्त झाल्याने निवाराच हरपला

संदीप जाधव

महाड : येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत अनेक कुटुंबात जीवितहानी तर झालीच, शिवाय मेहनत करून साठविलेल्या पुंजीतून घेतलेले घरच उद्ध्वस्त झाले. केवळ अंगावरील कपड्यानिशी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी घरातील सर्व ऐवज सोडून बाहेर पडलेल्या अनेक कुटुंबांनी संपूर्ण आयुष्यभराची पुंजीच गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून आले. आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्याची काळजी वाटतेय, आमच्या मुलाबाळांची शिक्षणे कशी करायची? असे अनेक प्रश्न दुर्घटनाग्रस्तांनी प्रशासनासमोर मांडले.

या इमारतीत राहणाºया इरफान जोगीलकर यांना तर आपले दु:ख मांडताना अक्षरश: रडू कोसळले. इरफान यांची मिनीडोर रिक्षा आहे. तेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. मात्र, या इमारतीखाली संपूर्ण मिनीडोर चिरडून तिचा चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न जोगीलकर यांना पडला आहे. त्यांचा एक मुलगा इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षात आहे. त्याच्या कॉलेजच्या फीसाठी पै-पै करून जमा केलेले ७० हजार रुपये घरातच जपून ठेवले होते. आता ते सारेच गेले. जोगीलकर यांच्याप्रमाणे या दुर्घटनेतील मुस्तुफा समद चाफेकर, इर्शाद अनवारे, नदीम बांगी, हसीम शेखनाग, अन्सारी, शौकत अलसुरकर, अयुब चिचकर, अख्तर पठाण, दाऊद हजवाने आदी कुटुंबेही याच संकटात सापडलेली आहेत. एका कुटुंबाने तर घराबरोबरच शंभरहून अधिक तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज गमावल्याचे सांगताना, त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

बचाव कार्यात एनडीआरएफसह साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणो आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, कोल्हापूरची व्हाइट आर्मी यांचा समावेश होता.भाडेकरूंना मदत कराबिरवाडी : महाडमधील तारिक गार्डन या इमारत दुर्घटनेत बाधित झालेल्या भाडेकरूंना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बिरवाडी विभाग संपर्कप्रमुख येथील रहिवासी अख्तर पठाण यांनी केली आहे. शासन आणि फ्लॅटधारकांसाठी मदत जाहीर केली असली, तरी या इमारतींमधील फ्लॅटमध्ये असणाºया भाडेकरूंच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी.

गेल्या सहा वर्षांपासून तारिक गार्डन या इमारतीमध्ये अख्तर पठाण भाडेतत्त्वावर राहत होते. लॉकडाऊन असल्याने अख्तर पठाण त्यांच्या महाड तालुक्यातील कुसगाव येथील मूळगावी वास्तव्यास होते, तर त्यांची पत्नी व मुले ही मुंबईत असल्याने प्राण वाचले आहेत. मात्र, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.बेघर कुटुंबांची आंबेडकर स्मारकात व्यवस्था : या दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या कुटुंबांची शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये तात्पुरता निवाºयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे भोजनाचीही व्यवस्था महाड नगरपरिषद आणि सेवाभावी संस्थांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. बुधवारी सकाळी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड