शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:46 IST

महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली.

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली. जुलै २००५ च्या या नैसर्गिक दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत असली, तरी या काळरात्रीच्या आठवणी आणि जखमा दरडग्रस्तांच्या जीवनात कायम आहेत. मूठभर दरडग्रस्त गावांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे काम प्रशासनाने राबवले असले, तरी महाड तालुक्यातील सर्वच डोंगराळ गावे आणि गावांतील रहिवासी आजही दरडीच्या छायेत जगत आहेत.जुलै २००५मधील २५ आणि २६ तारीख संपूर्ण महाडकरांना चिरंतन आठवणीत राहील, अशी आहे. या दिवशी दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या चार गावांमध्ये १८२ निष्पाप ग्रामस्थ डोंगरावरून येणाºया दरडीमध्ये गाडले गेले. संपूर्ण महाराष्टÑात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. अवघा महाराष्टÑ प्रलयकारी पुरामध्ये वेढला गेला असल्याने अपेक्षित मदत पोहोचण्यास विलंब झाला. पुराचे पाणी आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर शासन आणि सामाजिक संस्थांनी महाडमधील दरडग्रस्त गावांना मदतीचा हात दिला. दरडीची माती काढणे, वाहून गेलेला रस्ता बनवणे, दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना जेवण, राहणे, कपडे आदी सुविधा पुरवणे यासह दरडग्रस्तांच्या मृतदेहाची योग्य प्रकारे आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. जनकल्याण ट्रस्ट, प्राइड इंडिया, लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट आदी संस्थांनी दरडग्रस्तांना पक्क्या घरांसाठी मदत केली. शासनाने दिलेल्या मदतीच्या आवाहनाला सामाजिक संस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाडमधील दरडग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक सुविधा मिळाल्या. २००५च्या या दुर्घटनेला आता १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ आणि २६ जुलै २००५मधील दरडग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनाचा आधार मिळाला असला तरी जीवाभावाचे आप्तेष्ट, सगेसोयरे या काळरात्रीने हिरावून नेले याचे दु:ख आजही दरडग्रस्तांच्या मनात जखमांच्या रूपाने जिवंत आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, अशा दरडग्रस्त गावांना सर्वतोपरी मदत दिली. मात्र, दरडीचा धोका डोक्यावर असणारे संभाव्य दरडग्रस्त गाव आजही कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित आहेत.