शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:46 IST

महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली.

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली. जुलै २००५ च्या या नैसर्गिक दुर्घटनेला आज १२ वर्षे पूर्ण होत असली, तरी या काळरात्रीच्या आठवणी आणि जखमा दरडग्रस्तांच्या जीवनात कायम आहेत. मूठभर दरडग्रस्त गावांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसनाचे काम प्रशासनाने राबवले असले, तरी महाड तालुक्यातील सर्वच डोंगराळ गावे आणि गावांतील रहिवासी आजही दरडीच्या छायेत जगत आहेत.जुलै २००५मधील २५ आणि २६ तारीख संपूर्ण महाडकरांना चिरंतन आठवणीत राहील, अशी आहे. या दिवशी दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या चार गावांमध्ये १८२ निष्पाप ग्रामस्थ डोंगरावरून येणाºया दरडीमध्ये गाडले गेले. संपूर्ण महाराष्टÑात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. अवघा महाराष्टÑ प्रलयकारी पुरामध्ये वेढला गेला असल्याने अपेक्षित मदत पोहोचण्यास विलंब झाला. पुराचे पाणी आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर शासन आणि सामाजिक संस्थांनी महाडमधील दरडग्रस्त गावांना मदतीचा हात दिला. दरडीची माती काढणे, वाहून गेलेला रस्ता बनवणे, दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना जेवण, राहणे, कपडे आदी सुविधा पुरवणे यासह दरडग्रस्तांच्या मृतदेहाची योग्य प्रकारे आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. जनकल्याण ट्रस्ट, प्राइड इंडिया, लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट आदी संस्थांनी दरडग्रस्तांना पक्क्या घरांसाठी मदत केली. शासनाने दिलेल्या मदतीच्या आवाहनाला सामाजिक संस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाडमधील दरडग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक सुविधा मिळाल्या. २००५च्या या दुर्घटनेला आता १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २५ आणि २६ जुलै २००५मधील दरडग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनाचा आधार मिळाला असला तरी जीवाभावाचे आप्तेष्ट, सगेसोयरे या काळरात्रीने हिरावून नेले याचे दु:ख आजही दरडग्रस्तांच्या मनात जखमांच्या रूपाने जिवंत आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, अशा दरडग्रस्त गावांना सर्वतोपरी मदत दिली. मात्र, दरडीचा धोका डोक्यावर असणारे संभाव्य दरडग्रस्त गाव आजही कायमस्वरूपी पुनर्वसनापासून वंचित आहेत.