शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 23:15 IST

पनवेलमध्ये भातपीक झाले आडवे : कोरोना, वादळानंतरही संकटांची मालिका सुरूच

नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना व निसर्ग चक्रीवादळातून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या मनात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे धडकी भरली आहे. पनवेल परिसरात काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे.

भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची विशेषत: पनवेल, उरणची काही वर्षांपूर्वी राज्यभर ओळख होती. परंतु नवी मुंबईची उभारणी, एमआयडीसी, जेएनपीटी व इतर प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले. नैनामुळे उरलेल्या शेतीच्या जागेवरही इमारती उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंटच्या जंगलातही अद्याप हजारो शेतकºयांनी शेती व्यवसाय सुरूच ठेवला आहे. भात हेच या परिसरातील प्रमुख पीक आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली आहे. परंतु काही महिन्यांपासून शेतकºयांच्या जीवनात संकटाची मालिकाच सुरू आहे. कोरोनामुळे मार्चपासून जनजीवन विस्कळीत झाले. त्यातून सावरत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान केले. वादळाशी सामना करून भाताची लागवड करून त्याची देखभाल करण्यात शेतकरी व्यस्त असतानाच बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.पळस्पे व इतर ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेरे व इतर ठिकाणी शेतीचे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भातशेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाऊस पडला तर तो शेतकºयांना हवाच आहे. परंतु मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवशी पनवेलमध्ये ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. पळस्पे, कर्नाळा, तारा व इतर अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. शेतात केलेले श्रम पाण्यात वाहून गेले आहेत.शासनाकडून मदतीची मागणीपनवेल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे जमिनीवर पडली आहेत. शेतकºयांनी केलेले परिश्रम पाण्यात गेले आहेत.-चंद्रकांत भगत,प्रगतशील शेतकरी, पळस्पे

अतिवृष्टीमुळे कर्नाळा परिसरातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तारा गाव व परिसरातील भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली असून, नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी.- मोरेश्वर पाटील,शेतकरी तारा गाव

नेरे परिसरात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अशा प्रकारे पाऊस पडला तर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.- परेश पाटील, शेतकरी, नेरे गाव

टॅग्स :Rainपाऊस