शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 23:15 IST

पनवेलमध्ये भातपीक झाले आडवे : कोरोना, वादळानंतरही संकटांची मालिका सुरूच

नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना व निसर्ग चक्रीवादळातून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या मनात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे धडकी भरली आहे. पनवेल परिसरात काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे.

भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची विशेषत: पनवेल, उरणची काही वर्षांपूर्वी राज्यभर ओळख होती. परंतु नवी मुंबईची उभारणी, एमआयडीसी, जेएनपीटी व इतर प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले. नैनामुळे उरलेल्या शेतीच्या जागेवरही इमारती उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंटच्या जंगलातही अद्याप हजारो शेतकºयांनी शेती व्यवसाय सुरूच ठेवला आहे. भात हेच या परिसरातील प्रमुख पीक आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली आहे. परंतु काही महिन्यांपासून शेतकºयांच्या जीवनात संकटाची मालिकाच सुरू आहे. कोरोनामुळे मार्चपासून जनजीवन विस्कळीत झाले. त्यातून सावरत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान केले. वादळाशी सामना करून भाताची लागवड करून त्याची देखभाल करण्यात शेतकरी व्यस्त असतानाच बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.पळस्पे व इतर ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेरे व इतर ठिकाणी शेतीचे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भातशेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाऊस पडला तर तो शेतकºयांना हवाच आहे. परंतु मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवशी पनवेलमध्ये ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. पळस्पे, कर्नाळा, तारा व इतर अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. शेतात केलेले श्रम पाण्यात वाहून गेले आहेत.शासनाकडून मदतीची मागणीपनवेल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे जमिनीवर पडली आहेत. शेतकºयांनी केलेले परिश्रम पाण्यात गेले आहेत.-चंद्रकांत भगत,प्रगतशील शेतकरी, पळस्पे

अतिवृष्टीमुळे कर्नाळा परिसरातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तारा गाव व परिसरातील भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली असून, नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी.- मोरेश्वर पाटील,शेतकरी तारा गाव

नेरे परिसरात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अशा प्रकारे पाऊस पडला तर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.- परेश पाटील, शेतकरी, नेरे गाव

टॅग्स :Rainपाऊस