शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 23:15 IST

पनवेलमध्ये भातपीक झाले आडवे : कोरोना, वादळानंतरही संकटांची मालिका सुरूच

नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना व निसर्ग चक्रीवादळातून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या मनात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे धडकी भरली आहे. पनवेल परिसरात काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे.

भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची विशेषत: पनवेल, उरणची काही वर्षांपूर्वी राज्यभर ओळख होती. परंतु नवी मुंबईची उभारणी, एमआयडीसी, जेएनपीटी व इतर प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले. नैनामुळे उरलेल्या शेतीच्या जागेवरही इमारती उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंटच्या जंगलातही अद्याप हजारो शेतकºयांनी शेती व्यवसाय सुरूच ठेवला आहे. भात हेच या परिसरातील प्रमुख पीक आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली आहे. परंतु काही महिन्यांपासून शेतकºयांच्या जीवनात संकटाची मालिकाच सुरू आहे. कोरोनामुळे मार्चपासून जनजीवन विस्कळीत झाले. त्यातून सावरत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान केले. वादळाशी सामना करून भाताची लागवड करून त्याची देखभाल करण्यात शेतकरी व्यस्त असतानाच बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.पळस्पे व इतर ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेरे व इतर ठिकाणी शेतीचे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भातशेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी पाऊस पडला तर तो शेतकºयांना हवाच आहे. परंतु मुसळधार पाऊस झाला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवशी पनवेलमध्ये ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. पळस्पे, कर्नाळा, तारा व इतर अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली आहेत. शेतात केलेले श्रम पाण्यात वाहून गेले आहेत.शासनाकडून मदतीची मागणीपनवेल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे जमिनीवर पडली आहेत. शेतकºयांनी केलेले परिश्रम पाण्यात गेले आहेत.-चंद्रकांत भगत,प्रगतशील शेतकरी, पळस्पे

अतिवृष्टीमुळे कर्नाळा परिसरातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तारा गाव व परिसरातील भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली असून, नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी.- मोरेश्वर पाटील,शेतकरी तारा गाव

नेरे परिसरात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने फारसे नुकसान झाले नसले तरी पुन्हा अशा प्रकारे पाऊस पडला तर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.- परेश पाटील, शेतकरी, नेरे गाव

टॅग्स :Rainपाऊस