शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पर्यटनातून मिळणार स्थानिकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:36 AM

पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे.

जयंत धुळप ।अलिबाग : गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण इच्छूक तरुणाई आणि इतिहासप्रेमी यांना सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण करता यावे, याकरिता रायगडचे निसर्ग व इतिहासप्रेमी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका विशेष योजनेची निर्मिती केली आहे. गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण यातून पर्यटनवृद्धी आणि पर्यटनातून स्थानिक ग्रामस्तरावर स्थानिकांना रोजगार संधी, असे या योजनेचे स्वरूप राहणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या कार्यालयात या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गडभ्रमण आणि निसर्गभ्रमणात कार्यरत डॉ. चंद्रशेखर साठे, पक्षी तज्ज्ञ डॉ. वैभव देशमुख, युथ हॉस्टेल सदस्य अनिल जोशी, सरिता गायकवाड व युथ हॉस्टेल पर्यावरण आणि गड सवर्धन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात एकूण ३९ ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी इतिहासप्रेमी आणि विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात गिरिभ्रमणादरम्यान सुमारे २० मृत्यू झाले आहेत, तर सुयोग्य वाटाड्याअभावी जंगलात चुकण्याचे प्रसंग घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण ही संकल्पना युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया या गिरिभ्रमण उपक्रम आयोजनात व्यस्त संस्था व अशाच हेतूने स्थानिक पातळीवर कार्यरत संस्था, किल्ल्याच्या जवळील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी, गडकिल्ल्याच्या परिसरातील स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि स्थानिक युवक, जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा, वन विभाग व स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना अमलात आणण्याचे नियोजन या बैठकीतील चर्चेतून करण्यात आले.पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेशपहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील गडभ्रमण उपक्रम व्यस्त संस्थांचा समन्वय साधून उर्वरित किल्ल्यावर ही योजना टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येणार आहे.गिरिभ्रमणास येणाऱ्यांची नोंदणी, वाटाड्याची सुविधा, गडावर आवश्यक माहिती फलक, निवारा व न्याहरी व्यवस्था, पक्षी व इतिहासविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सत्वर साहाय्य आदीचा समावेश या सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेत करण्यात येणार आहे. दरम्यान, अलिबाग जवळच्या सागरगड किल्ल्यावरील सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता करावयाच्या नियोजनाकरिता लवकरच ग्रामस्थ व स्थानिकांबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Fortगड