शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जीवनावश्यक साहित्यासाठी 'जीव धोक्यात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 23:33 IST

सामाजिक अंतराचा पडला विसर : संचारबंदीच्या भीतीने नागरिकांची बाजारात गर्दी, मात्र सकाळी ११ नंतर शुकशुकाट

अलिबाग : जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कनफेक्शनरी, सर्व खाद्य दुकाने, कृषी उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहणार असली तरी या दुकानांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ८ पर्यंत मुभा असेल. जिल्ह्यात बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडताच नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती चेन ब्रेक करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केलेले असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे २० एप्रिलपासून किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली असल्याने नागरिक सकाळपासूनच गर्दी करीत होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेतही नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. साहित्य घेण्याच्या नादात सामाजिक अंतराचाच विसर पडल्याचे दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आठ ते पंधरा दिवसांच्या सामानाची तरतूद घरात करावी यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट, भाजी मार्केट, फळ बाजार, मासळी बाजार येथे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. संचारबंदीच्या भीतीने नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. मात्र, कोरोना काळात सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असताना कुठेही या नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. किराणा दुकान, भाजी, फळे, मासळी बाजारात नागरिकांकडून आणि दुकानदारांकडून सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत होता. त्यामुळे, या गर्दीने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती वाढली आहे.

nकिराणा दुकाने nदूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री nभाजीपाला विक्री nफळे विक्री nअंडी, मटण, चिकन, मासे विक्री nकृषी संबंधित सर्व सेवा / दुकानेnपशुखाद्य विक्री nबेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने nपाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने nयेणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस