शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

जंजिरा किल्ल्याच्या सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात केली वाढ, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:38 IST

Janjira fort : किल्ल्यास संरक्षण नसल्याने आणि येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही तपासणी होत नसल्याने मुक्त संचार होता. त्यामुळे अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्ये करू शकतात, असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे सांगण्यात आले होते.

आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जगात प्रसिद्ध असून, हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील शेकडो पर्यटक मोठ्या प्रमाणात किल्ला पाहण्यासाठी येत असतात. परंतु या किल्ल्यास कोणतीही सुरक्षा नव्हती. या किल्ल्यावर पोलीस संरक्षण नव्हते. त्यामुळे सर्वांना मुक्त संचार होता. याबद्दल नुकतेच ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या किल्ल्यास संरक्षण देण्यात आले आहे.किल्ल्यास संरक्षण नसल्याने आणि येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही तपासणी होत नसल्याने मुक्त संचार होता. त्यामुळे अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्ये करू शकतात, असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे सांगण्यात आले होते.  या बातमीची दखल पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. कधीही पोलिसांचा वावर नसणारा किल्ला आता पोलिसांच्या संरक्षणामुळे गजबजून गेला आहे.जंजिरा किल्ला बघण्यासाठी शनिवारी -रविवारी  देशविदेशातील दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक येत  असतात. नेहमी गर्दी असणारा हा किल्ला आहे. त्यामुळे संरक्षणासाठी सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये, सर्व पर्यटक भयमुक्त राहावेत, यासाठी पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.  

येणाऱ्या - जाणाऱ्यांची कसून तपासणीकिल्ला जेट्टीजवळ रोजच पोलीस बंदोबस्त असतो. पर्यटकांची कसून तपासणीही केली जाते. सध्या किल्ल्यात एक रायफलधारी पोलीस व महिला पोलीस, होमगार्ड असा बंदोबस्त असतो. राजपुरी जेट्टीजवळ एक पोलीस व महिला पोलीस, खोराबंदर एक पोलीस असा बंदोबस्त रोजच असतो, तसेच शनिवारी व रविवारच्या वेळी पर्यटकांची संख्या जास्त असते, त्याचा अंदाज घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढही केली जाते, तरी येणाऱ्या पर्यटकांनी तपासणी वेळेत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले. तसेच कुठेही संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू दिसल्यास बोट मालक-चालक व स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहनही केले.

टॅग्स :Raigadरायगड