शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:19 PM

महामार्गावरील पथदिवेही बंद; अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

कळंबोली : पनवेल मुंब्रा महामार्गावर कळंबोली येथे टी अ‍ॅण्ड टी कंपनीने बांधलेल्या पुलावर पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुलावरच पाणी साचून राहत आहे. याच पाण्यातून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

तसेच पुलावरील खांबातून पाणी झिरपत असल्याने ते कमकुवत होत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यास चालकांना अंदाज येत नसल्याने वाहने उसळून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पुलावर पडलेले खड्ड्यांची त्वरित डागडुजीकरण्याची मागणी चालकांकडून होत आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली स्टील मार्केट लगत ६१. ३७ कोटी खर्चून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. महामार्गालगत लोह-पोलाद मार्केट असल्याने सतत अवजड वाहतूक सुरू असते.

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटली. मात्र, पुलावर पडलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ते तिथेच साचते. साचलेले पाणी काही प्रमाणात पुलात झिरपते. त्यामुळे उड्डाणपूल कमकुवत होत आहे.पाणी साचल्यामुळे खड्डेही पडले आहेत. याशिवाय उड्डाणपुलावरील पथदिव्यांचे बिल कोणी भरायचे? यावरून रस्ते विकास महामंडळ व सिडको, महापालिका यांच्या वाद सुरू असल्याने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे साचलेले पाणी तसेच उड्डाणपुलावरील खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. वाहने खड्ड्यात आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरील पाणी निचरा करण्याकरिता पाइप लावणे आवश्यक होते; परंतु हा उड्डाणपूल बांधताना प्लम्बिंग करण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरसुद्धा पावसाचे पाणी साचत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यातच अशाप्रकारे अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खांदा वसाहतीत बांधण्यात आलेल्या पुलाचीही हीच अवस्था आहे. येथे ही वरून पावसाचे पाणी पडत आहे. याला सर्वस्वी रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेकाप प्रणित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे यांनी दिली.

कळंबोली अंडरपास सुद्धा पाण्यातपनवेल - मुंब्रा उड्डाणपुलाखालून कळंबोली गावात जाण्याकरिता सात मीटरचा अंडरपास बांधण्यात आला आहे. येथून पादचारी आणि हलकी वाहने जाऊ शकतात. या अंडरपास मध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेले पाणी निचरा होण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच कळंबोलीकरांना मार्ग काढावा लागत आहे. या बाबत उपाययोजना करण्याची मागणी कळंबोलीकर करत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यावर खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत असल्याने अपघात होत आहेत.