शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:19 IST

महामार्गावरील पथदिवेही बंद; अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

कळंबोली : पनवेल मुंब्रा महामार्गावर कळंबोली येथे टी अ‍ॅण्ड टी कंपनीने बांधलेल्या पुलावर पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुलावरच पाणी साचून राहत आहे. याच पाण्यातून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

तसेच पुलावरील खांबातून पाणी झिरपत असल्याने ते कमकुवत होत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यास चालकांना अंदाज येत नसल्याने वाहने उसळून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पुलावर पडलेले खड्ड्यांची त्वरित डागडुजीकरण्याची मागणी चालकांकडून होत आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली स्टील मार्केट लगत ६१. ३७ कोटी खर्चून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. महामार्गालगत लोह-पोलाद मार्केट असल्याने सतत अवजड वाहतूक सुरू असते.

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटली. मात्र, पुलावर पडलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ते तिथेच साचते. साचलेले पाणी काही प्रमाणात पुलात झिरपते. त्यामुळे उड्डाणपूल कमकुवत होत आहे.पाणी साचल्यामुळे खड्डेही पडले आहेत. याशिवाय उड्डाणपुलावरील पथदिव्यांचे बिल कोणी भरायचे? यावरून रस्ते विकास महामंडळ व सिडको, महापालिका यांच्या वाद सुरू असल्याने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे साचलेले पाणी तसेच उड्डाणपुलावरील खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. वाहने खड्ड्यात आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरील पाणी निचरा करण्याकरिता पाइप लावणे आवश्यक होते; परंतु हा उड्डाणपूल बांधताना प्लम्बिंग करण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरसुद्धा पावसाचे पाणी साचत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यातच अशाप्रकारे अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खांदा वसाहतीत बांधण्यात आलेल्या पुलाचीही हीच अवस्था आहे. येथे ही वरून पावसाचे पाणी पडत आहे. याला सर्वस्वी रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेकाप प्रणित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे यांनी दिली.

कळंबोली अंडरपास सुद्धा पाण्यातपनवेल - मुंब्रा उड्डाणपुलाखालून कळंबोली गावात जाण्याकरिता सात मीटरचा अंडरपास बांधण्यात आला आहे. येथून पादचारी आणि हलकी वाहने जाऊ शकतात. या अंडरपास मध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेले पाणी निचरा होण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच कळंबोलीकरांना मार्ग काढावा लागत आहे. या बाबत उपाययोजना करण्याची मागणी कळंबोलीकर करत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यावर खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत असल्याने अपघात होत आहेत.