शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:19 IST

महामार्गावरील पथदिवेही बंद; अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

कळंबोली : पनवेल मुंब्रा महामार्गावर कळंबोली येथे टी अ‍ॅण्ड टी कंपनीने बांधलेल्या पुलावर पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुलावरच पाणी साचून राहत आहे. याच पाण्यातून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

तसेच पुलावरील खांबातून पाणी झिरपत असल्याने ते कमकुवत होत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यास चालकांना अंदाज येत नसल्याने वाहने उसळून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पुलावर पडलेले खड्ड्यांची त्वरित डागडुजीकरण्याची मागणी चालकांकडून होत आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली स्टील मार्केट लगत ६१. ३७ कोटी खर्चून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. महामार्गालगत लोह-पोलाद मार्केट असल्याने सतत अवजड वाहतूक सुरू असते.

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटली. मात्र, पुलावर पडलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ते तिथेच साचते. साचलेले पाणी काही प्रमाणात पुलात झिरपते. त्यामुळे उड्डाणपूल कमकुवत होत आहे.पाणी साचल्यामुळे खड्डेही पडले आहेत. याशिवाय उड्डाणपुलावरील पथदिव्यांचे बिल कोणी भरायचे? यावरून रस्ते विकास महामंडळ व सिडको, महापालिका यांच्या वाद सुरू असल्याने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे साचलेले पाणी तसेच उड्डाणपुलावरील खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. वाहने खड्ड्यात आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरील पाणी निचरा करण्याकरिता पाइप लावणे आवश्यक होते; परंतु हा उड्डाणपूल बांधताना प्लम्बिंग करण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरसुद्धा पावसाचे पाणी साचत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यातच अशाप्रकारे अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खांदा वसाहतीत बांधण्यात आलेल्या पुलाचीही हीच अवस्था आहे. येथे ही वरून पावसाचे पाणी पडत आहे. याला सर्वस्वी रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेकाप प्रणित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे यांनी दिली.

कळंबोली अंडरपास सुद्धा पाण्यातपनवेल - मुंब्रा उड्डाणपुलाखालून कळंबोली गावात जाण्याकरिता सात मीटरचा अंडरपास बांधण्यात आला आहे. येथून पादचारी आणि हलकी वाहने जाऊ शकतात. या अंडरपास मध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेले पाणी निचरा होण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच कळंबोलीकरांना मार्ग काढावा लागत आहे. या बाबत उपाययोजना करण्याची मागणी कळंबोलीकर करत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यावर खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत असल्याने अपघात होत आहेत.