शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वीज कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: June 17, 2017 01:56 IST

पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाड शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी निवारण्यासाठी

- सिकंदर अनवारे। लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाड शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी निवारण्यासाठी महाडमध्ये महावितरणचे कर्मचारी कमी पडत आहेत. मागील महिन्यात बदलून गेलेले कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि यापूर्वीची रिक्त पदे यामुळे सुमारे ६१ कर्मचाऱ्यांची तूट महाड तालुक्यात निर्माण झाली आहे. याचा फटका कर्मचाऱ्यांवर अधिक कामाचा भार पडण्यात आणि वारंवार विजेचा लपंडाव सुरू राहण्यावर झाला आहे.वीज वितरण कंपनीच्या महाड उपविभागात महाड शहर, महाड ग्रामीण, बिरवाडी, एमआयडीसी, नाते, वाहूर, कुंभले, विन्हेरे ही आठ शाखा कार्यालये येतात. प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे तसेच वारा आणि विजेच्या धक्क्यांमुळे तांत्रिक बिघाड होत आहेत. संपूर्ण तालुक्यात वीज वाहक तारांचे जाळे पसरल्यामुळे एखाद्या छोट्याशा बिघाडासाठी एक अखंड शाखा कार्यालय अंतर्गत येणारा विभाग काळोखात जात आहे. या बिघाड दुरुस्तीसाठी नैसर्गिक अडचणीसोबत महावितरण निर्मित कर्मचारी तुटवड्याची अडचण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगर आणि जंगल भागातून विजेच्या तारा खेचल्या गेल्यामुळे कर्मचारी तुटवड्याचा त्रास अधिक प्रमाणात जाणवत आहे.गेल्या वर्षभरापासून कर्मचारी तुटवडा असताना मे महिन्यामध्ये ५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर २२ कर्मचारी आपल्या गावी बदली करून परत गेले. नागपूर, भंडारा आदि विभागातून आलेले हे कर्मचारी नोकरी मिळण्याकरिता कोकण विभागात येतात आणि नियमाप्रमाणे तीन वर्षे पूर्ण करून पुन्हा आपल्या गावी परत जातात. यामुळे कोकणातील कर्मचारी तुटवडा कायमच राहतो. याचा फटका थेट ग्राहकांना बसत असून याची दखल महावितरणने घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. महाड महावितरण उपविभागांतर्गत १५० गावे येत असून सुमारे ५२ हजार ४०५ वीज ग्राहक आहेत. या गावातून वितरीत होणाऱ्या विजेपोटी ९० टक्के बिल वसुली होत असून चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी आहे. ही बाब लक्षात घेता महावितरणने येथे पुरेसा कर्मचारीवर्ग देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने ग्राहकांना सध्याच्या परिस्थितीत तासन्तास अंधारात रहावे लागत असल्याने वीज वितरण कंपनीबाबत संताप व्यक्त होत आहे.- सध्याची परिस्थिती पाहिली तर महाड महावितरण उपविभागांतर्गत महाड शहर, महाड ग्रामीण, बिरवाडी, एमआयडीसी, नाते, वहूर, कुंभले विन्हेरे अशा आठ शाखा असून १५० गावांचा समावेश आहे, तर ५२ हजार ४०५ वीज ग्राहक आहेत. या आठ शाखांमध्ये १०९ कर्मचाऱ्यांची गरज आहे. असे असताना ६१ पदे रिक्त आहेत. नागरिकांना बसतोय फटका३१ मे रोजी महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या दिवशीपासून आजपर्यंत रात्री अपरात्री दिवसा कधीही वीज खंडित होण्याचे, काही न काही बिघाड होणे प्रकार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता हा फटका मात्र थेट ग्राहकांना बसत आहे. तरी वरिष्ठ कार्यालयाने कर्मचारी समस्येकडे तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरून समस्या दूर करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.पावसाळा सुरू झाल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत असून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून यामुळे लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांवर देखील याचा परिणाम होत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.गेली वर्षभर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे. - जी. एस. जाधव, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण महाड उपविभाग.