शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

बिरवाडी समस्यांच्या विळख्यात, नियोजनाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:40 IST

महाड तालुक्यातील ऐतिहासिक बिरवाडी समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. नियोजनाचा अभाव असल्याने स्वच्छता, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

- दीपक साळुंखेमहाड : महाड तालुक्यातील ऐतिहासिक बिरवाडी समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. नियोजनाचा अभाव असल्याने स्वच्छता, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे, तर आठ हजार लोकसंख्या व साडेतीन हजारपेक्षा जास्त मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये कोरमअभावी ग्रामसभा तहकूब होत असल्याने महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीलगत वसलेल्या बिरवाडी गावामधील समस्यांना जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण आहे.गावाच्या दोनही बाजूला औद्योगिक वसाहत वसली असल्याने या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वर्षातून होणाऱ्या चारही ग्रामसभा या कोरमअभावी तहकूब होत असल्याने महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.तसेच सांडपाण्याची गटारे तुडुंब भरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर ग्रामपंचायतीच्या घनकचरा उचलण्याकरिता दोन घंटागाड्या कार्यरत आहेत. सलग सुट्टीच्या कालावधीमध्ये बिरवाडीच्या मुख्य रस्त्यालगत कचºयाचे ढीग निर्माण होत असल्याने शासनाच्या स्वच्छता मोहिमेचे बारा वाजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये कुंभारवाडा, मधले आवाड, आदर्शनगर, नवीन बाजारपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांची देखील दुरवस्था झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पात्र दूषित झाले असून याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायतीला वारंवार नोटीस बजावली आहे.बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ ग्रामपंचायत सदस्य असून या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पक्षाचे १५ सदस्य तर विरोधी पक्षाचा प्रत्येकी एक एक सदस्य निवडून आला आहे. ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेमध्ये गावातील या समस्यांबाबत आवाज उठविला नसल्याची माहिती मिळाली आहे.महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना कामाबाबत तक्रारी झाल्याने पाच कोटी रुपयांची योजना मंजूर होऊन देखील बिरवाडीची पाणीसमस्या कायम आहे. या पाणी योजनेवर फिल्ट्रेशन प्लांट बसविण्याची तरतूद नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो. बिरवाडीमधील सांडपाणी समस्या सोडविण्याकरिता उद्योगमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून ती मागणी अपूर्ण असल्याने या ठिकाणी मातीचा बंधारा घालून सांडपाणी काळ नदीपात्रात जाण्यापासून रोखण्याच्या कामात दरवर्षी हजारो रुपये खर्च होत असल्याची माहिती बिरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.सुरक्षेचाही प्रश्नबिरवाडीमध्ये लोकसहभागातून उभारलेली पोलीस चौकी बंद असल्याने, तसेच कायमस्वरूपी वाहतूक पोलीस या ठिकाणी नसल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर चोरी, घरफोडी यासारख्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाºयांची उदासीनता दिसून येत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड