शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कशेडी घाट प्रवाशांसाठी धोकादायक; ६० ते ७० फूट रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:46 IST

महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; तहसीलदारांशी पत्रव्यवहार

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरपासून सुरू होणाऱ्या कशेडी घाटात पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर एका अवघड चढणीवर दोन मोठे तडे गेले आहेत. मध्य भागातील ६० ते ७० फूट रस्त्याचा संपूर्ण भाग खचून गेला आहे. सध्या हा भाग कधीही कोसळून या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर हद्दीत १२ किमीचा कशेडी घाट म्हणून संपूर्ण चढ लागतो.सध्याच्या परिस्थितीत वाहनांसाठी धोकादायक स्थिती बनली आहे. जवळच असलेल्या महामार्ग वाहतूक शाखा व कशेडी पोलिसांनी पोलादपूरच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच महाडचे प्रांताधिकारी व पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. ठिकठिकाणचे महामार्ग पडलेले खड्डे तर नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे होणाºया अडचणी अशा परिस्थितीत या मार्गावरून वाहनांनी प्रवास करणे कठीण बनले आहे.दरवर्षी या घाटामध्ये एक ते दोन ठिकाणी रस्ता साधारण खचण्याची घटना घडत असते. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून मलमपट्टी लावत डागडुजी केली जाते. यंदा संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला कशेडी घाटात दोन मोठे तडे गेले आहेत आणि दोन तड्यांच्या जवळपास ६० ते ७० फुटांच्या मधल्या भागात महामार्गच खचला आहे.पावसामुळे यात तड्यांमध्ये पाणी झिरपून महामार्गाचा हा रस्ता कधीही खाली खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून याच रस्त्यावर दरदिवशी हजारो वाहने कोकणच्या तळकोकणात जातात. तर कोकणातून मुंबई दिशेला ये-जा करत यामधून हजारो प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळेत याच मार्गाने शेकडो प्रवासी बसेसची वर्दळ असते.खचलेल्या भागामध्ये आजूबाजूला कोणतेही गाव नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे-झुडूपे असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या लाइटच्या उजेडाशिवाय काही नसते. जी दुर्घटना महाड सावित्री पुलावर घडली त्याच पद्धतीत याही ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देखील महामार्ग बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. खबरदारी म्हणून अद्याप या विभागामार्फत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. या खचलेल्या भागामध्ये एखादे वाहन आल्यानंतर त्या ठिकाणी वाहनाला जम्प घेत निघून जावे लागते. तर हा भाग सरळसरळ उतारावरच असल्याने नवी वाहन चालकांना या ठिकाणचा अंदाज मिळत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते. तरी या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.होणाºया अपघाताला जबाबदार कोण?महाड तालुक्यात २ आॅगस्ट २०१६ मध्ये एक मोठी सावित्री पूल दुर्घटना घडली होती. त्या ठिकाणी जवळच असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे इतरांचे प्राण वाचले. मात्र, या कशेडी घाटामध्ये खचलेल्या ठिकाणापासून आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगलाशिवाय काहीच नाही. अशा वेळी जर रात्रीच्या वेळेस हा भाग खचून खाली क ोसळला तर कोकणातून या ठिकाणाहून वेगातून घाट उतरणारी वाहने सरळसरळ खोल दरीत कोसळू शकतील. अशी कोणतीच घटना होण्यापूर्वीच खबरदारीची पावले उचलणे गरजेचे आहे.सध्या या कशेडी घाट खचलेल्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. दिवसा देखील जोपर्यंत वाहनचालक समोर पोहोचत नाही, तोपर्यंत खचलेला भाग लक्षात येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी तर काहीच दिसत नाही.आजही काही वाहक वाहने या ठिकाणाहून वेगाने घेऊन जात आहे. मात्र, रात्रीची खबरदारी म्हणून या ठिकाणी रेडियममध्ये बोर्ड किंवा सोलर सिग्नल बसवणे, तसेच खचत असलेल्या भागात तात्पुरते बॅरिगेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी या भागाची गणपतीपूर्वी डागडुजी करणे गरजेचे आहे. सणादरम्यान याच भागातून हजारो प्रवासी कोकणात जातात.कशेडी घाट ज्या ठिकाणी तडे जाऊन खचलेला आहे ते ठिकाण अत्यंत धोकादायक आहे. या संदर्भात महामार्ग वाहतूक शाखा पोलीस कशेडीमार्फत राष्टÑीय महामार्ग विभाग आणि पोलादपूर तहसीलदार यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, महाडचे प्रांताधिकारी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना फोनद्वारे कळविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतूक शाखेकडून बॅरिगेट लावण्यात आले आहेत.- एम. ए. गमरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक पोलीस शाखा, कशेडीतातडीने दखल घ्यावीसध्याच्या परिस्थितीत कशेडी घाटातील खचलेला भाग हा अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी राष्टÑीय महामार्ग हा कोकणवासीयांचा एकमेव जवळचा मार्ग आहे.अशा परिस्थितीत या मार्गाला कोणती मोठी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांचा जीव धोक्यात येण्यापूर्वीच याची खबरदारी घेण्यात यावी, यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राष्टÑीय महामार्ग विभाग यांनी याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा