शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कर्जत ठाकूरवाडीला समस्यांचे ग्रहण, सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:36 AM

कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारावा लागत आहे. असे असताना याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांकडून केला जात आहे.यामध्ये प्रामुख्याने देऊळवाडी ते ठाकूरवाडी वस्तीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या कच्च्या रस्त्यावरून ग्रामस्थांना गेली कित्येक वर्षे ये -जा करावी लागत आहे. डोंगर उतारावर ही वाडी असल्याने संपूर्ण रस्ता वळणाचा आणि चढ-उताराचा आहे. येथे पक्का रस्ता नसल्याने शासकीय बससेवा तसेच खासगी रिक्षा सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या आदिवासींना जड सामान घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते.तसेच वाडीत कोणी जास्तच आजारी पडल्यास त्या रु ग्णाला चादरीची झोळी करून रु ग्णालयात न्यावे लागते, तर कधी कधी महिलांची प्रसूती नाइलाजाने जीव धोक्यात घालून घरीच करावी लागते. यामुळे महिलेला हवे तसे उपचार मिळत नाहीत.या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. त्यांच्यासाठी येथे सार्वजनिक पाण्याची विहीर आहे. पावसाळा आणि त्यानंतर चार महिने जेमतेम पाणी पुरते. मात्र उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडत असल्याने दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे पाणीही कमीपडत असल्याने येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन वणवण भटकावे लागते.याबाबत ग्रामस्थांबरोबर संवाद साधला असता त्यांनी या वाडीची नोंद शासकीय दरबारी नसल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी खेटे घातले, परंतु त्यांना संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती गणेश पारधी, पांडू दरवडे, मंगल साबरी, गणेश सांबरी, लक्ष्मण पिरकट, वामन सांबरी, प्रदीप सांबरी, चंद्रकांत हिंदोळा, काळुराम लोटे, दामू सांबरी, रामा दरवडे यांनी दिली.विजेच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्तया वाडीवर वीज पोहोचली आहे; परंतु अनेक वेळा कमी दाबाने वीज असल्याची ग्रामस्थांची तक्र ारी आहेत. या वाडीत शासकीय साधन सुविधा सवलतीची कमतरता असून अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ते अजूनही यापासून वंचित आहे.या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. येथे अनेक सुविधांची वानवा आहे.

टॅग्स :Raigadरायगड