कर्जत आगार महाराष्ट्रात पहिले
By Admin | Updated: May 6, 2016 01:22 IST2016-05-06T01:22:13+5:302016-05-06T01:22:13+5:30
चार-पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून
कर्जत आगार महाराष्ट्रात पहिले
- विजय मांडे, कर्जत
चार-पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून उत्पन्नही वाढविले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा आगाराचे उत्पन्न घटले व लाखो रु पयांचा तोटा होऊ लागला. त्यानंतर एक चालक असलेल्या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि त्यांच्या कल्पकतेमुळे आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढले व मागील एप्रिल ते मार्च महिन्यात एक कोटी ६९ लाख ५८ हजार रु पयांचा तोटा असलेले आगार यंदा ती तूट भरून काढीत ३५ लाख २३ हजार रु पये फायद्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तीन लाख किलोमीटर प्रवासात वाढ झाली असून प्रवासी संख्याही लक्षणीय वाढली आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यात कर्जत आगार प्रथम क्र मांकावर होते आणि यंदा महाराष्ट्रात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर आले आहे.
तीस-बत्तीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत आगार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यावेळी एस.टी. ही एकच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे एस.टी. फायद्यात होती. कालांतराने रिक्षा, सहा आसनी रिक्षा आल्या आणि एसटीची घरघर सुरु झाली. काही मार्गावरच्या एसटी गाड्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे कर्जतचे आगार बंद होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तत्कालीन आगार व्यवस्थापक बी. डी. मगदूम यांनी अनेक क्लृप्त्या काढून विविध मार्गावर गाड्या सुरु करून कर्जत आगाराला चांगले दिवस आणले. ते निवृत्त झाले व त्यानंतर आलेल्या आगार व्यवस्थापकांनी केवळ पाट्या टाकण्याचे काम केल्याने पुन्हा कर्जत आगार अडचणीत आले. लाखो
रु पयांचा तोटा होऊ लागला.
आगार व्यवस्थापकांची बदली झाली आणि प्रभारी आगार व्यवस्थापक पद आगारात चालक असलेल्या डी. एस. देशमुख यांच्याकडे आले.
विविध एस. टी. संघटनांमध्ये काम केलेल्या देशमुख यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी असल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विविध उत्पन्नाच्या बाबी शोधून आगार सुस्थितीत आणले. लाखोंचा तोटा भरून काढून फायद्यामध्ये आगार आले. गतवर्षी रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये उत्पन्नात प्रथम
क्र मांकावर आणले. यंदाच्या आर्थिक वर्षात १२४.३६ या उच्चांकी गुण
क्र मांकाने महाराष्ट्रात उत्पन्नात सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला.
इतकेच करून देशमुख गप्प बसले नसून कामगारांसाठी कबड्डी, हॉलीबॉल आणि क्रि केट खेळण्यासाठी आगाराच्या दुर्लक्षित जागेवर मैदाने उपलब्ध करून दिली. शिवाय संपूर्ण आगार व्यसनमुक्त करण्याची किमया सुद्धा देशमुखांनी केली असून शासकीय आदेशांचे पालन करून विविध उपक्र म राबविण्यात सुद्धा हे सर्व कर्जत आगाराचे कर्मचारी पुढे असतात.