शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जत विधानसभा मतदारसंघ : वाहतूककोंडी, आरोग्य, रस्ते, पाणीसमस्या सुटता सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 03:01 IST

कर्जत विधानसभा क्षेत्रात कर्जत तालुका, खोपोली नगरपरिषद क्षेत्र आणि खालापूर तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे.

- विजय मांडेकर्जत : कर्जत विधानसभा क्षेत्रात कर्जत तालुका, खोपोली नगरपरिषद क्षेत्र आणि खालापूर तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात कर्जत, खोपोली आणि माथेरान अशा तीन नगरपरिषदा तसेच खालापूर नगरपंचायत आहे आणि विशेष म्हणजे, माथेरानच्या पायथ्याशी असलेली नेरळ ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, खोपोली औद्योगिक क्षेत्र असूनही वाढती बेरोजगारी, पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने शहरांमधील वाहतूककोंडी, कर्जत-पनवेल लोकल सेवा माथेरान मिनीट्रेन सेवा आणि सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पेण अर्बन बँकेत अडकलेले ठेवीदारांचे पैसे आदी प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा निश्चितच प्रभाव पडणार आहे.कर्जत शहर हे मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या अगदी मधोमध आहे. त्यामुळे या शहराला महत्त्व आहे. तसेच तालुक्यात जगप्रसिद्ध माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे. खोपोलीसाठी स्वतंत्र लोकल सेवा असल्याने खोपोली औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्येसुद्धा कर्जतहून असंख्य कामगार जात असतात. या औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना टाळे लागले आहे तर काही आजारी पडल्याने बेरोजगारी वाढली आहे. दरवर्षी कोटी रुपये खर्च होत असूनही तालुक्यातील काही मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. तर ग्रामीण भागातील रस्ते कित्येक दिवस डांबरीकरणाची वाट पाहत आहेत. चौक-मुरबाड रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. पळसदारी मार्गे जाणा-या कल्याण-खोपोली रस्त्याचे तर गेल्या कित्येक वर्षांपासून बांधकाम सुरू आहे.मध्येमध्ये वनखात्याच्या जमिनीच्या अडचणीमुळे काही ठिकाणी रुंदीकरण रखडले आहे. चारचौकात अतिक्रमणांमुळे नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली कर्जत शहराची पाणीपुरवठा योजना अपुरी पडू लागली आहे. जलशुद्धीकरण केंद्र असूनही पावसाळ्यात नेहमीच नळाद्वारे गढूळ पाणी येत असते. योग्य दाब नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. वारंवार वीज खंडित होत असल्याने पाण्याचे वेळापत्रक आठवड्यातून एकदा तरी कोलमडतेच. गेल्या पाच वर्षांत त्याबद्दल ठोस निर्णय घेण्यात आला नाही.कोंढणे धरण कथित भ्रष्टाचाराच्या गाळात अडकल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न भविष्यात उद्भवणार आहे. माथेरान पर्यटन स्थळात अनेक समस्या आहेत. नेरळची परिस्थितीही वेगळी नाही. अनेक वर्षांपासून सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात साकार होत नाही.ढाक गाव पर्यटनस्थळ व्हावे माथेरान जागतिक पर्यटनस्थळ असले तरी कर्जत शहरापासून अवघ्या सहा-सात किलोमीटर अंतरावर डोंगरावर ढाक गाव आहे. तेथेसुद्धा मोठे पठार आहे. पुणे जिल्ह्यातूनसुद्धा तेथे सहज येता येईल. ते मिनी माथेरान म्हणून विकसित केल्यास पर्यटनस्थळ म्हणून त्याचा उदय होईल. अनेक वर्षांपासून त्याचा विकास व्हावा यासाठी स्थनिक प्रयत्न करीत आहेत; परंतु राज्य शासन हिरवा कंदील देत नाही. कर्जतकरांची एक महत्त्वाची समस्या म्हणजे पेण अर्बन बँक बरोबर दहा वर्षांपूर्वी ती बंद झाली आणि कर्जतकरांच्या तोंडचे पाणी पळाले. त्या वेळी जमिनींना चांगला भाव मिळत होता. अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आणि त्याचे मिळालेले पैसे जास्त दराच्या लोभामुळे पेण अर्बन बँकेत ठेवले. थोडे थोडके नव्हे तर कर्जतकारांच्या ९०-९२ कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. त्याच वेळी बँक बंद झाली. या घटनेमुळे काही जण हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. काहींच्या मुला-मुलींची अगदी साखरपुडा झालेली लग्नही पैसे नसल्याने होऊ शकली नाहीत. अनेकांची उपासमार झाली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. पैसे मिळण्यासाठी अनेक आंदोलने झाली. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’ मिळत गेली. काहीही झाले नाही. हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न तसाच राहिला आहे.तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा, दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा गंभीर होत असलेला प्रश्न आदी अनेक समस्या आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने विकासात्मक कामे झाली त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत झाली नाहीत.- दीपाली पिंगळे, सरपंच,रजपे ग्रामपंचायतपनवेल लोकलसेवा सुरू व्हावीकर्जत-पनवेल लोकलसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण ती कधी होणार? हा प्रश्न आहे. नेरळ-माथेरान, अमन लॉज-माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू होणे गरजेचे आहे. हे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असले तरी सर्वसामान्यांना ते समजत नाहीत, हे प्रश्न सुटावे हीच अपेक्षा उपजिल्हा रुग्णालय असून काही उपयोग नाही, अशी गत झाली आहे. तेथे नवीन उपकरणांची आवश्यकता आहे. तसेच तज्ज्ञांची व संयमी वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मतदारसंघातील शहरापासून ते अगदी वाडी वस्तीतील रस्ते होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karjat-acकर्जत