शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जेएसडब्ल्यूच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी : शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे संकेत

नागोठणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी सकाळी १० पासून सुरुवात करण्यात आली. काम दिवसभरात पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल, असे जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

येथील केटी बंधारा ते डोलवी अशी जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून कंपनीकडून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नागोठणेसह या मागातील ४५ गावे व वाड्यांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. १९ जुलैला ही जलवाहिनी फुटल्याने कंपनीकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांनीच कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ही जलवाहिनी महामार्गाच्या खाली असल्याने ठेकेदाराकडून रस्ता खोदण्यास हरकत घेण्यात आली व रस्ता खोदायचा असल्यास जिल्हाधिकाºयांची परवानगी आणणे बंधनकारक आहे, अशी सूचना कंपनीला दिल्याने काम बंद करण्यात आले होते. कंपनीने परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकाºयांकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांना परवानगी मिळविण्यात यश मिळत नव्हते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून ही परवानगी मिळवून दिली व गुरुवारी कामाला सुरुवात करण्यात आली.

याबाबत येथील ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य शैलेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. गोºहे यांनी याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये वाचले होते व प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाबाबत चालढकल केली जात आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले होते. तातडीने त्यांनी तसेच विधान परिषदेतील त्यांचे सचिव खेबुडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांकडून तातडीने संबंधित आदेश काढण्याची सूचना दिली व त्याप्रमाणे गुरुवारी कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात या जलवाहिनीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका बजावल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले.पूर्वीच्या महामार्गाच्या जुन्या रस्त्यापासून ही जलवाहिनी १५ मीटर दूर होती; परंतु चौपदरीकरणाच्या कामात नव्या रस्त्याच्या खाली ही जलवाहिनी गेल्याने महामार्ग खोदल्याशिवाय तिचे काम शक्यच नव्हते. दोन पाइपना जोडणारी रिंग बाहेर आल्याने पाण्याची गळती प्रचंड प्रमाणात चालू होती. हे काम करण्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार असून काम सायंकाळपर्यंत पूर्ण होईल व शुक्रवारपासून ही जलवाहिनी पूर्ववत चालू होईल आणि सर्व गावांना पाणी उपलब्ध होईल.

-मुरलीधर नायर, पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जेएसडब्ल्यूमहामार्गावर पोलीस तैनातखोदकामासाठी नागोठण्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून महाडकडे जाणारी सर्व वाहतूक, मिरामोहिद्दीन शाहबाबा कमानीमार्गे रिलायन्स चौक, आंबेघर फाटा, वरवठणे, आमडोशीकडून वाकण फाट्यावर, तर मुंबईकडे जाणारी वाहने याच मार्गावरून रिलायन्स चौकामार्गे होली एंजल शाळेमार्गेपेण फाट्यावरून महामार्गावर वळविण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणासाठी सर्व फाट्यांवरदोन पोलीस अधिकाºयांसह १५ वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात आले होते, अशी माहिती येथील पोलीस ठाण्याचे पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड