शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जेएसडब्ल्यूच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:15 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी : शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे संकेत

नागोठणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी सकाळी १० पासून सुरुवात करण्यात आली. काम दिवसभरात पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल, असे जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

येथील केटी बंधारा ते डोलवी अशी जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून कंपनीकडून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नागोठणेसह या मागातील ४५ गावे व वाड्यांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. १९ जुलैला ही जलवाहिनी फुटल्याने कंपनीकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांनीच कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ही जलवाहिनी महामार्गाच्या खाली असल्याने ठेकेदाराकडून रस्ता खोदण्यास हरकत घेण्यात आली व रस्ता खोदायचा असल्यास जिल्हाधिकाºयांची परवानगी आणणे बंधनकारक आहे, अशी सूचना कंपनीला दिल्याने काम बंद करण्यात आले होते. कंपनीने परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकाºयांकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांना परवानगी मिळविण्यात यश मिळत नव्हते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून ही परवानगी मिळवून दिली व गुरुवारी कामाला सुरुवात करण्यात आली.

याबाबत येथील ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य शैलेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. गोºहे यांनी याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये वाचले होते व प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाबाबत चालढकल केली जात आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले होते. तातडीने त्यांनी तसेच विधान परिषदेतील त्यांचे सचिव खेबुडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांकडून तातडीने संबंधित आदेश काढण्याची सूचना दिली व त्याप्रमाणे गुरुवारी कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात या जलवाहिनीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका बजावल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले.पूर्वीच्या महामार्गाच्या जुन्या रस्त्यापासून ही जलवाहिनी १५ मीटर दूर होती; परंतु चौपदरीकरणाच्या कामात नव्या रस्त्याच्या खाली ही जलवाहिनी गेल्याने महामार्ग खोदल्याशिवाय तिचे काम शक्यच नव्हते. दोन पाइपना जोडणारी रिंग बाहेर आल्याने पाण्याची गळती प्रचंड प्रमाणात चालू होती. हे काम करण्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार असून काम सायंकाळपर्यंत पूर्ण होईल व शुक्रवारपासून ही जलवाहिनी पूर्ववत चालू होईल आणि सर्व गावांना पाणी उपलब्ध होईल.

-मुरलीधर नायर, पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जेएसडब्ल्यूमहामार्गावर पोलीस तैनातखोदकामासाठी नागोठण्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून महाडकडे जाणारी सर्व वाहतूक, मिरामोहिद्दीन शाहबाबा कमानीमार्गे रिलायन्स चौक, आंबेघर फाटा, वरवठणे, आमडोशीकडून वाकण फाट्यावर, तर मुंबईकडे जाणारी वाहने याच मार्गावरून रिलायन्स चौकामार्गे होली एंजल शाळेमार्गेपेण फाट्यावरून महामार्गावर वळविण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणासाठी सर्व फाट्यांवरदोन पोलीस अधिकाºयांसह १५ वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात आले होते, अशी माहिती येथील पोलीस ठाण्याचे पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड