शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:10 IST

महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. याची रक्कम महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ लाख दहा हजार रुपये आली असून, ४९ गावांमधील २००० शेतकºयांना याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.प्रत्यक्षात १ कोटी ५८ लाख रुपये भरपाई रक्कम येथे अपेक्षीत होते मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग या नाराज आहे. शासनाने शेतकºयांवर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी रक्कम जमा झाल्याने किती शेतकºयांना हा मोबदला देण्यात येणार आहे आणि शिल्लक शेतकºयांचा पैसा कधी येईल याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यांमध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये दोन हजार २३ शेतकरी बाधित झाले.या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून ४५ लाख दहा हजार ८६९ नुकसानभरपाई दाखल झाली असल्याची माहिती महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तालुक्यामध्ये सुमारे सात हजार शेतकºयांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.महाडमधील २०३ शेतक-यांचा पीक विमामहाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या तर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दोन हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे जरी करण्यात आले असले, तरी सुमारे सात हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगरउतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहे.|तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, विमा कंपनीकडूनहीत्यांना भरपाई मिळेल. मात्र, विमा प्रकरण मंजूर होईपर्यंत शासकीय मदत शेतकºयांना मिळणार आहे.पुढील टप्प्यातील वाटप कधी; प्रशासन अनभिज्ञसध्या आलेली रक्कम ही अपुरी आहे आणि नुकसानग्रस्त शेतकरी संख्या अधिक आहे.आलेली रक्कम कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.ही अपुरी रक्कम वाटपानंतर पुढील टप्पा कधी येणार याबाबत मात्र महसूल विभागाकडून काही सांगण्यात आले नाही.

टॅग्स :agricultureशेतीRaigadरायगडFarmerशेतकरी