शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:10 IST

महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. याची रक्कम महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ लाख दहा हजार रुपये आली असून, ४९ गावांमधील २००० शेतकºयांना याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.प्रत्यक्षात १ कोटी ५८ लाख रुपये भरपाई रक्कम येथे अपेक्षीत होते मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग या नाराज आहे. शासनाने शेतकºयांवर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी रक्कम जमा झाल्याने किती शेतकºयांना हा मोबदला देण्यात येणार आहे आणि शिल्लक शेतकºयांचा पैसा कधी येईल याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यांमध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये दोन हजार २३ शेतकरी बाधित झाले.या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून ४५ लाख दहा हजार ८६९ नुकसानभरपाई दाखल झाली असल्याची माहिती महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तालुक्यामध्ये सुमारे सात हजार शेतकºयांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.महाडमधील २०३ शेतक-यांचा पीक विमामहाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या तर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दोन हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे जरी करण्यात आले असले, तरी सुमारे सात हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगरउतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहे.|तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, विमा कंपनीकडूनहीत्यांना भरपाई मिळेल. मात्र, विमा प्रकरण मंजूर होईपर्यंत शासकीय मदत शेतकºयांना मिळणार आहे.पुढील टप्प्यातील वाटप कधी; प्रशासन अनभिज्ञसध्या आलेली रक्कम ही अपुरी आहे आणि नुकसानग्रस्त शेतकरी संख्या अधिक आहे.आलेली रक्कम कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.ही अपुरी रक्कम वाटपानंतर पुढील टप्पा कधी येणार याबाबत मात्र महसूल विभागाकडून काही सांगण्यात आले नाही.

टॅग्स :agricultureशेतीRaigadरायगडFarmerशेतकरी