शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:10 IST

महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. याची रक्कम महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ लाख दहा हजार रुपये आली असून, ४९ गावांमधील २००० शेतकºयांना याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.प्रत्यक्षात १ कोटी ५८ लाख रुपये भरपाई रक्कम येथे अपेक्षीत होते मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग या नाराज आहे. शासनाने शेतकºयांवर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी रक्कम जमा झाल्याने किती शेतकºयांना हा मोबदला देण्यात येणार आहे आणि शिल्लक शेतकºयांचा पैसा कधी येईल याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यांमध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये दोन हजार २३ शेतकरी बाधित झाले.या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून ४५ लाख दहा हजार ८६९ नुकसानभरपाई दाखल झाली असल्याची माहिती महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तालुक्यामध्ये सुमारे सात हजार शेतकºयांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.महाडमधील २०३ शेतक-यांचा पीक विमामहाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या तर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दोन हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे जरी करण्यात आले असले, तरी सुमारे सात हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगरउतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहे.|तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, विमा कंपनीकडूनहीत्यांना भरपाई मिळेल. मात्र, विमा प्रकरण मंजूर होईपर्यंत शासकीय मदत शेतकºयांना मिळणार आहे.पुढील टप्प्यातील वाटप कधी; प्रशासन अनभिज्ञसध्या आलेली रक्कम ही अपुरी आहे आणि नुकसानग्रस्त शेतकरी संख्या अधिक आहे.आलेली रक्कम कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.ही अपुरी रक्कम वाटपानंतर पुढील टप्पा कधी येणार याबाबत मात्र महसूल विभागाकडून काही सांगण्यात आले नाही.

टॅग्स :agricultureशेतीRaigadरायगडFarmerशेतकरी