शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

माणगावात रानभाज्यांची आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:01 IST

माणगाव तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गालगत आदिवासी महिला मोठ्या प्रमाणावर रानभाज्या विकायला बसलेल्या दिसतात.या रानभाज्यांमध्ये करटोली, शेवलं, अकुर, भारंग, कुलू ( कुवाळा ), रानटी टेरी, गरगटी, आळू, म्हशेळीपान, कुर्डु, कुड्याची शेंग-फुल, शेवग्याची पानं-फुलं, टाकळा, इत्यादी प्रकार सापडतात. भवरीची पानं, याच्या बेसन लावून वड्या करतात. आता हा भाजीचा प्रकार फक्त ऐकण्यापुरता शिल्लक राहिला असल्याचे खेड्यातील जाणकार सांगतात. स्थानिकांसह प्रवासी पर्यटक रानभाज्या घेण्यासाठी गर्दी करत आहेत.या भाज्या पावसाळ्यात मिळत असल्याने त्यांना चांगली मागणी असते. पूर्वी माणगाव तालुक्यात दारोदार घ्या गों भाजी...असा आवाज देऊन आदिवासी विकत असताना दिसत असत. मात्र आता अलीकडे महामार्गावरच आदिवासी महिला रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या आढळतात. पावसाळ्यात हे आदिवासी याच व्यवसायातून चार पैसे कमवितात व आपला चरितार्थ चालवितात.1या भाज्या शिजविताना एका विशिष्ट पद्धतीतच त्या बनव्यावा लागतात. यात शेवलाची भाजी बनविताना भोंडग्याचा पाला वापरतात. आणखी एका प्रकारचा पाला वापरला जातो, त्याला नान्याचा पाला असे खेड्यात संबोधतात. हा पाला सुकवतात आणि जसा लागेल तसा वापरतात. मुंबईकर गावाकडे आले की हा पाला घेऊन जातात. यातील प्रत्येक भाजीचे अनेक औषधी उपयोग गावाकडे सांगितले जातात. या भाज्यांची उपलब्धता ही केवळ पावसाळ्यातच असते. त्यामुळे इतर वेळी या भाज्यांची पिके घेता येत नाही.2कुलू कुवाळा हे एक प्रकारचे कोवळे गवतच असते. याची चव कांद्याच्या पातीसारखीच आहे. या भाज्या नुसत्या कांदा, लसुणीवर बनविण्यात येतात. चवीसाठी यात डाळी, बीरड देखील टाकतात आणि फारच थोडे तेल, मीठ वापरावे लागते. अतिशय पौष्टिक, चवदार आणि पचायला हलक्या असतात. भारंग भाजी खाण्यामुळे पोटाचे, पचनसंस्थेचे अनेक विकार बरे होतात असे अनेक जण ठामपणे सांगतात. असे म्हणतात की पावसाळ्यात एकदातरी या भाज्या खाव्यात.

टॅग्स :Raigadरायगड