शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

रायगड जिल्ह्यात आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:10 IST

तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

अलिबाग : जिल्ह्यात पावसाने उद्भवलेल्या महापुरामुळे तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह भारतीय लष्करालाही पाचारण केले आहे. पेणमध्ये त्यांचा बेस कॅम्प राहणार असल्याने जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी निर्माण होणाऱ्या आपत्तीस्थळी तातडीने मदतीसाठी ते पोहोचणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या ७२ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, महाड, पोलादपूर हे जलमय झाले होते. पुराचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला होता. मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होेते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेतली होती. आता एनडीआरएफच्या सोबतच भारतीय लष्करही मदतीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे.पेण तालुक्यात तब्बल ४९८ मिमी पाऊस झाला होता, तसेच धरणातून सोडलेले पाणी आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी भारतीय लष्कराचे मेजर हिमांशू सलुजा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. निसर्गाच्या प्रकोपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी करून जिल्हा प्रशासनाकडून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जांभूळपाड्यानंतरचा सर्वात मोठा पूरजिल्ह्यात पुढील कालावधीत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक पेणमध्ये तैनात राहणार आहे. पुण्यातून येण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, नागरिक, प्रशासन, पोलीस यंत्रणा, तटरक्षक दल असे सर्वच आहेत. मात्र आपत्तीच्या कालावधीत मदतीसाठी हात कमी पडू नयेत, तातडीने मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक येथेच राहणार आहे. १९८९ साली जांभूळपाडा येथे आलेल्या महापुरानंतर पेण तालुक्यात आलेला महापूर मोठा होता, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरIndian Armyभारतीय जवान