शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रायगड जिल्ह्यात आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:10 IST

तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

अलिबाग : जिल्ह्यात पावसाने उद्भवलेल्या महापुरामुळे तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह भारतीय लष्करालाही पाचारण केले आहे. पेणमध्ये त्यांचा बेस कॅम्प राहणार असल्याने जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी निर्माण होणाऱ्या आपत्तीस्थळी तातडीने मदतीसाठी ते पोहोचणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या ७२ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, महाड, पोलादपूर हे जलमय झाले होते. पुराचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला होता. मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होेते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेतली होती. आता एनडीआरएफच्या सोबतच भारतीय लष्करही मदतीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे.पेण तालुक्यात तब्बल ४९८ मिमी पाऊस झाला होता, तसेच धरणातून सोडलेले पाणी आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी भारतीय लष्कराचे मेजर हिमांशू सलुजा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. निसर्गाच्या प्रकोपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी करून जिल्हा प्रशासनाकडून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जांभूळपाड्यानंतरचा सर्वात मोठा पूरजिल्ह्यात पुढील कालावधीत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक पेणमध्ये तैनात राहणार आहे. पुण्यातून येण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, नागरिक, प्रशासन, पोलीस यंत्रणा, तटरक्षक दल असे सर्वच आहेत. मात्र आपत्तीच्या कालावधीत मदतीसाठी हात कमी पडू नयेत, तातडीने मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक येथेच राहणार आहे. १९८९ साली जांभूळपाडा येथे आलेल्या महापुरानंतर पेण तालुक्यात आलेला महापूर मोठा होता, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरIndian Armyभारतीय जवान