शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

रायगड जिल्ह्यात आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:10 IST

तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

अलिबाग : जिल्ह्यात पावसाने उद्भवलेल्या महापुरामुळे तब्बल १,५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह भारतीय लष्करालाही पाचारण केले आहे. पेणमध्ये त्यांचा बेस कॅम्प राहणार असल्याने जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी निर्माण होणाऱ्या आपत्तीस्थळी तातडीने मदतीसाठी ते पोहोचणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या ७२ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, महाड, पोलादपूर हे जलमय झाले होते. पुराचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला होता. मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होेते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची मदत घेतली होती. आता एनडीआरएफच्या सोबतच भारतीय लष्करही मदतीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे.पेण तालुक्यात तब्बल ४९८ मिमी पाऊस झाला होता, तसेच धरणातून सोडलेले पाणी आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी भारतीय लष्कराचे मेजर हिमांशू सलुजा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. निसर्गाच्या प्रकोपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी करून जिल्हा प्रशासनाकडून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जांभूळपाड्यानंतरचा सर्वात मोठा पूरजिल्ह्यात पुढील कालावधीत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक पेणमध्ये तैनात राहणार आहे. पुण्यातून येण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, नागरिक, प्रशासन, पोलीस यंत्रणा, तटरक्षक दल असे सर्वच आहेत. मात्र आपत्तीच्या कालावधीत मदतीसाठी हात कमी पडू नयेत, तातडीने मदत मिळावी यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक येथेच राहणार आहे. १९८९ साली जांभूळपाडा येथे आलेल्या महापुरानंतर पेण तालुक्यात आलेला महापूर मोठा होता, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरIndian Armyभारतीय जवान