शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 2:26 AM

उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषयक पथक तयार

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाकाळात इतर आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच या कालावधीत डेंग्यूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषय़क एक पथक तयार करून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असला, तरी डेंग्यू तापाचे प्रमाण घटले आहे.रायगड जिल्ह्यात जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या कालावधीत फक्त १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहे, तर उर्वरित पाच जण डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील डेंग्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. कोरोना कालावधीत न भासलेली पाणीटंचाई आणि कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबल्यामुळे डेंग्यू आटोक्यात आल्याचीही यामागची मुख्य कारणे आहेत.पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. पण, जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे पावसाचे पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये घराघरांत साठवून ठेवले जाते. मात्र, या पाण्याची साठवण करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यावर्षी डेंग्यू आटोक्यात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. ज्या ठिकाणी बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या ठिकाणी पाण्याची साठवण केली जात असते. या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.  हिवताप आणि डेंग्यूसारखे आजार बळावतात. डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; नागरिकांनी या उपाययोजना कराव्यातनागरिकांनी यावर उपाययोजना म्हणून पाणी १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे. स्वतःसह परिसराची स्वच्छता राखावी. ताजे आणि गरम अन्‍नच खावे. दिवसातून किमान पाच लीटर पाणी प्यावे. सार्वजनिक ठिकाणी रूमाल, मास्क वापरावा. सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवावी. डासांपासून स्वसंरक्षण करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अशा उपाययोजना केल्या तर साथीचे आजार दूर राहू शकतात. कामानिमित्ताने जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण मोठे आहे. कामानिमित्ताने सातत्याने स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. सततच्या बदलणा-या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी कावीळ, अतिसार व घशाच्या आजाराने त्रस्त असलेले २५ ते ३० रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.-डॉ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय)डेंग्यूची लक्षणेअचानक तीव्र ताप येणेतीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखीअशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणेउलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणेअंगावर पुरळ येणे, लाल चट्टे उठू लागतात

टॅग्स :dengueडेंग्यू