शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
3
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
4
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
5
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
6
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
7
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
8
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
9
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
10
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
11
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
13
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
14
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
15
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
16
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
17
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
18
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
19
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
20
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:37 IST

दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग - दिल्ली स्फोट प्रकरणानंतर रायगड जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा पोलीस दलाने भर दिला आहे. समुद्र किनाऱ्यांबरोबरच फाऊस्टार हॉटेलसुद्धा सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा तपासून समुद्र किनाऱ्यांवरील १ हजाराहून अधिक कॉटेजेस आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यांवर सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे.

दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पेण, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांमधील कोस्टल आणि लँडींग भागात शस्त्रधारी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन देखील राबविण्यात आले आहेत.मच्छीमारांसोबत संवाद साधून त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस पाटील यांच्या बैठकीद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जाणारा ताज हॉटेल येणाऱ्यांची माहिती नोंदवून ठेवण्यात येत आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलीसांची सतत गस्त सुरू आहे.

सायबर सेलची नजरसोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही संघटनांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया सेल सक्रिय आहे. सायबर सेल प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे आणि ही यंत्रणा २४ तास सुरू राहणार आहे.

सागरी किनाऱ्यांवर लक्ष रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतत काम करत आहे. जे कर्मचारी दीर्घकालीन सुट्टीवर आहेत, त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. पोलीस दलाकडे चार बोटी असून मच्छीमारांच्या बोटींच्या साहाय्याने सागरी किनाऱ्यांवरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. किनाऱ्यांवर दररोज पायी पेट्रोलिंग केल्या जात असून, मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी होत आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची २४ तास गस्ती सुरू आहे. - आँचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक.

English
हिंदी सारांश
Web Title : Raigad Strengthens Coastal Security After Delhi Blast; Police Engage Fishermen

Web Summary : Following the Delhi blast, Raigad police enhanced coastal security. Increased vigilance includes checking hotels, coastline patrols, and engaging with fishermen. Security forces are on alert, conducting operations, and monitoring social media to prevent rumors. Vehicle checks and passenger screenings are intensified.
टॅग्स :delhiदिल्लीRaigadरायगडPoliceपोलिस