शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:37 IST

दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग - दिल्ली स्फोट प्रकरणानंतर रायगड जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा पोलीस दलाने भर दिला आहे. समुद्र किनाऱ्यांबरोबरच फाऊस्टार हॉटेलसुद्धा सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा तपासून समुद्र किनाऱ्यांवरील १ हजाराहून अधिक कॉटेजेस आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यांवर सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे.

दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पेण, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांमधील कोस्टल आणि लँडींग भागात शस्त्रधारी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन देखील राबविण्यात आले आहेत.मच्छीमारांसोबत संवाद साधून त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस पाटील यांच्या बैठकीद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जाणारा ताज हॉटेल येणाऱ्यांची माहिती नोंदवून ठेवण्यात येत आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलीसांची सतत गस्त सुरू आहे.

सायबर सेलची नजरसोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही संघटनांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया सेल सक्रिय आहे. सायबर सेल प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे आणि ही यंत्रणा २४ तास सुरू राहणार आहे.

सागरी किनाऱ्यांवर लक्ष रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतत काम करत आहे. जे कर्मचारी दीर्घकालीन सुट्टीवर आहेत, त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. पोलीस दलाकडे चार बोटी असून मच्छीमारांच्या बोटींच्या साहाय्याने सागरी किनाऱ्यांवरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. किनाऱ्यांवर दररोज पायी पेट्रोलिंग केल्या जात असून, मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी होत आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची २४ तास गस्ती सुरू आहे. - आँचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक.

English
हिंदी सारांश
Web Title : Raigad Strengthens Coastal Security After Delhi Blast; Police Engage Fishermen

Web Summary : Following the Delhi blast, Raigad police enhanced coastal security. Increased vigilance includes checking hotels, coastline patrols, and engaging with fishermen. Security forces are on alert, conducting operations, and monitoring social media to prevent rumors. Vehicle checks and passenger screenings are intensified.
टॅग्स :delhiदिल्लीRaigadरायगडPoliceपोलिस