शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

दुपारी असह्य झळा, रात्र थंडा थंडा कूल; रायगडमध्ये बदलत्या वातावरणाचा अनुभव

By निखिल म्हात्रे | Published: April 12, 2024 5:11 PM

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

निखिल म्हात्रे, अलिबाग : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर, संध्याकाळी तो २६ पर्यंत खाली येत असल्याने असह्य उकाडा आणि गारवा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव येथे येत आहे. गुरुवारनंतर तापमानाचा पारा आणखी पाच ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.

गुलाबी थंडीचा आनंद लुटल्यानंतर रायगडकर आता उन्हाच्या झळांनी घामाघूम होऊ लागले आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी नागरिक थंड पेयांना पसंती देत आहेत.

रायगडात गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होऊ लागला आहे. याचा परिणाम तापमानावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान आता ३३ अंशांवर जाऊ लागले आहे, असे जाणकार सांगतात. 

मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. पण, काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माठांची मागणी वाढली आहे. यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट आहेत. - दीपक पाटील, माठ विक्रेता

उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली आहे. मात्र, थंड पदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारण ठरू शकतात.- डाॅ. विनित शिंदे

टॅग्स :alibaugअलिबागTemperatureतापमान