शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

खासदार झाल्यास भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:30 IST

मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले.

कार्लेखिंड : मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले. रोजगार, नोटाबंदी, जीएसटी यामुळे अनेक व्यवसाय बुडाले. आमचे सरकार होते तेव्हा जीएसटी कायदा लागू करण्याचे काम आम्ही करत होतो. त्या वेळी ज्या ठिकाणी भाजप सरकार होते त्यांनी तिथे विरोध केला होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या आरसीएफ प्रकल्पाला चालना दिली होती. तरुण सुशिक्षित पिढीला नोकरी लावण्याचे काम आम्ही केले होते. नागोठणे येथील आयपीसीएल कंपनीतील गेल्या चार-सहा महिन्यांमध्ये मी निवृत्त भूमिपुत्रांच्या मुलांना आयपीसीएल कंपनीमध्ये सामावून घेण्याचे काम केले आहे. मी खासदार झाल्यावर येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन, असे आश्वासन आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले.रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०१९ चे उमेदवार सुनिल दत्तात्रेय तटकरे यांच्या प्रचारार्थ खडताळपूल येथे आयोजित करण्यात आली होती, या वेळी तटकरे बोलत होते. राजकारणाबरोबरच समाजकारणाचे काम पाटील आणि तटकरे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या करत आहेत. आमची संस्थाने खालसा करण्याची वार्ता जे करत आहेत ते करू शकत नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला. येथील मच्छीमार बांधवाचे प्रश्न आमच्या शासनाच्या काळात मांडले होते. त्या वेळी मांडवा जेटीची उभारणी आम्ही केली आहे. येथील पर्यटनाला चालना मिळाली. अलिबाग रेल्वेचे प्रश्न का उपेक्षित आहेत. गीते सहा वेळा खासदार झाले; परंतु आपल्या खात्यामार्फत कोणतेही काम त्यांनी केलेले नाही. या राज्यामध्ये आपल्या खात्यातून एकही कारखाना उभारलात का? असा खडा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून या तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या अटीवर सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला आहे, असे नमूद केले. २००९ च्या निवडणुकीत गीतेंना आरसीएफ प्रकल्पग्रस्त आणि पीएपीचे प्रलंबित प्रश्नांच्या अटीवर मदत करण्यात आली होती; परंतु गीते यांच्याकडे वेळोवेळी आठवण करूनही अजूनपर्यंत पश्न मार्गी लावले नाहीत, त्यामुळे आम्ही तटकरे यांना पाठिंबा देत आहोत. या प्रकल्पातील निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना त्या जागी नोकरीला लावणे. स्थानिकांच्या जमिनी घेऊन येथील तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत. कोळी समाजाच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.
राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या जागा कोळी बांधवांच्या मालकीच्या आहेत, असे एक ना अनेक प्रश्न केंद्रात लावून धरण्याचे काम तटकरे यांनी करावेत. केंद्रीय निधी रायगड जिल्ह्याला अधिक कसा मिळेल, असे प्रयत्न केले पाहिजेत. या सरकारने आरसीएफ थळ प्रकल्प -३ येण्यापासून रोखले आहे. हा कारखाना खासगीकरणाच्या घशात घालण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि खासगीकरण झाले तर येथील तरुण देशोधडीला लागेल, असे पाटील म्हणाले.या वेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, राजिप उपाध्यक्ष, आस्वाद पाटील, राजिप सदस्य चित्रा पाटील, नृपाल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे