शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

घरगुती सौरदीप योजना झाली बंद, शेतक-यांच्या घरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:02 AM

म्हसळा : रायगड जिल्ह्यात शेतकरी हा कृषी विभागाचा कणा मानला जातो. मात्र, त्याच शेतक-यांकडे कृषी विभाग पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे.

अरुण जंगम म्हसळा : रायगड जिल्ह्यात शेतकरी हा कृषी विभागाचा कणा मानला जातो. मात्र, त्याच शेतक-यांकडे कृषी विभाग पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतक-यांना ज्या प्रमाणे शेतीविषयक सल्ला हवा, तसा सल्ला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सौरदीप योजना जिल्ह्यात गेली दहा ते बारा वर्षांपासून सुरू होती. ही जुनी योजना या वर्षी बंद केल्याने शेतकºयांना आपल्या शेतात, घरात अंधारात काम करावे लागत आहे.कृषी विभागाची जिल्हा परिषद सेंस फंड व जिल्हा नियोजन समितीमार्फत शेतकºयांना घरगुती सौरदीप योजना गेल्या अनेक वर्षांपासून घराघरांत देण्याचे कार्य सुरू केले होते. त्या योजनेने शेतकºयांना शेतात रात्रीचे काम करणे सोईस्कर होत होते. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी वीज भारनियमन होत असल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शासनाच्या विविध योजना येतात आणि जातात; परंतु ही योजना शेतकºयांना पूरक होती. सामान्यातील सामान्य शेतकरी या योजनेचा पुरेपूर लाभ घेत होता. मात्र, असे असताना या योजनेला बाजूला ठेवून ज्या योजना शेतकºयांना उपयुक्त नाहीत, त्या योजना सुरू ठेवल्या आहेत. मात्र, ज्या योजना गरजेच्या आहेत त्या कोणत्या कारणामुळे बंद केल्या? असा प्रश्न रायगड शेतकरी करीत आहेत. पंचायत समितीमधील ‘कृषी विभाग’ शेतकºयांसाठी असणाºया योजना शेतकºयांना जरी लाभदायक असल्या तरी त्या योजना गावागावांत, खेड्या-वस्तीमध्ये पोहोचत नसल्याचा आरोप अनेक शेतकरी करीत आहेत.शासन आपल्या दारी केवळ कागदावरच दिसत आहे. सौरदीप योजनने विषयी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्याकडे संपर्क साधला असता, पनवेल महानगरपालिका झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे ५७ कोटींचे बजेट कमी झाले आहे; परंतु शेतक ºयांना अत्यावश्यक साधन-सुविधा देण्याचे काम करणार आहे. कृषी विभागाशी बोलून सौरदीप योजना सुरू करू.>शेतकºयांना गरजेच्या योजना देणे हे आमचे कर्तव्य आहे. डी.बी.टी. (प्रत्यक्ष लाभ) योजना निर्माण झाल्यापासून शेतकºयांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्ह्यातून नावीन्यपूर्ण बाबीसाठी ३५०० अर्ज आले; परंतु अनुदान अल्प असल्यामुळे शेतकºयांना सर्वच योजना देता येत नाहीत, याची खंत आहे. आम्ही तीन लाख रु पयांचे भात बियाणे विक्र ीसाठी ठेवले; पण डी.बी.टी. योजनेमुळे एक किलोही बियाणे कोणी खरेदी केले नाही. त्यामुळे सौरदीप संच योजनेमध्येही हाच प्रकार होण्याची भीती निर्माण होत आहे. तरीही शेतकºयांच्या मागण्यांनुसार ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल.- डी. बी. पाटील, कृषी सभापती,रायगड जिल्हा परिषद, अलिबाग>या वर्षातील तरतुदींमुळे काही योजना आर्थिक बाबींमुळे मागे पडल्यात कारण या वर्षी बजेट कमी झाले आहे; परंतु कृषी विभागामार्फत कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात, ते पाहून त्या योजनेमध्ये सौरदीप योजना असेल आणि या वर्षी ही योजना घेतली नसेल, तर आम्ही प्राधान्यक्र म देऊन ही सौरदीप योजना यावर्षीही घेण्यासाठी प्रयत्न करू.- अदिती तटकरे,रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा>आमच्या म्हसळा तालुक्यात सौरदीप संच योजना गेली अनेक वर्षे सुरू होती; परंतु या वर्षी ही योजना बंद केल्याने आम्हा शेतकºयांचे नुकसान झाले आहे. वीज भारनियमन सातत्याने होत असल्यामुळे ही योजना आम्हाला वरदान देणारी आहे, त्यामुळे ही योजना या वर्षीदेखील सुरू करावी.- दामाजी रामचंद्र पवार, शेतकरी, केलटेशेतकºयांच्या मागणीनुसार सौरदीप संच योजना सुरू केली जाईल.- डी.पी.वरपे, कृषी विकास अधिकारी,रायगड जिल्हा परिषद, अलिबाग