शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:12 IST

वडखळ, खोपोली, माणगाव वाहतूककोंडीची प्रमुख ठिकाणे

- सिकंदर अनवारे दासगाव : दरवर्षी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात वाहन चालकांना डोकेदुखी बनतो. यंदा देखील महामार्गाची दैना झाली असून या मार्गाने प्रवास करणे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणानंतर पळस्पे ते इंदापूर दरम्याच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तीच अवस्था दुसऱ्या टप्प्यातील पाली आणि खोपोली मार्गाच्या रुंदीकरणामुळे झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास अडचणीतून होणार असून त्यासाठी तासन्तास मोठी कसरत करावी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पळस्पे ते इंदापूर रखडल्यानंतर गेली सहा वर्षे या मार्गावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के वाहनचालकांनी पनवेल ते कोकण मार्ग बंद करत पनवेल द्रुतगती मार्गाने खोपोली-पाली-वाकण असा मार्ग अवलंबला होता. मात्र त्याही मार्गाचे यंदा रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. आता चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे इंदापूरपासून चिपळूणपर्यंत काम सुरू झाले आहे. या दुसºया टप्प्याच्या अर्धवट कामामुळे चालकांसह प्रवासीही त्रस्त असून कशेडी घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. पनवेल ते चिपळूण असा सध्याचा प्रवास मोठा कसरतीचा आणि अडचणीचा झाला आहे. सध्या पनवेल ते महाड २ तासाच्या प्रवासाला तब्बल पाच ते सहा तास लागत आहेत. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.कोकणात जाणाºया प्रवाशांसाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सोयीचा आहे. दरवर्षी याच मार्गावर गणपती सणामध्ये मोठ्या रांगा लागतात. दुसरा मार्ग कोकणात जाण्यासाठी असला तरी या मार्गापेक्षा जवळपास १०० किमी अंतराचा फरक पडतो. यंदा पनवेल ते इंदापूर महामार्गावरील खड्डे, पाली- खोपोली मार्गाचे रुंदीकरण आणि दुसºया टप्प्याचे रुंदीकरण या तिन्ही अडचणींना चाकरमान्यांना सामोरे जावे लागणार आहे. शासनाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचा दावा केला जात असला तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसात उखडून जात आहेत.कशेडी घाटाची भीती कायमयंदा पावसाचा जोर जास्त आहे. कशेडी घाटातील काही भाग खचला असून अतिवृष्टी झाल्यास घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात येतो.घाट बंद पडल्यानंतर याला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर विन्हेरे महाड असा मार्ग आहे. मात्र त्याही मार्गावर एक दोन ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून हा मार्ग अरुंद अवस्थेत आहे.माणगाव आणि वडखळ आजही वाहतुकीस डोकेदुखीमुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते महाड अंतरापर्यंत जवळपास दोन ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. वडखळ आणि माणगाव पेण ते वडखळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.या ठिकाणाहून अलिबाग आणि कोकणातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात अलिबागकडे जाणारी असतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे अवजड वाहनांची गती कमी होते आणि या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.त्यामुळे या दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन-दोन तीन-तीन तास लागतात. मात्र गणपती सणामध्ये हजारो वाहनांची संख्या असल्याने या ठिकाणी चांगलीच कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यानंतर मधला टप्पा खुला असला तरी पुन्हा माणगाव या ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सण असो किंवा इतर वेळी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असो या ठिकाणचा वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड