शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 23:56 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सिकंदर अनवारे दासगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतात. यंदा कोरोनामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. २५ अधिकारी आणि २९९ कर्मचारी तैनात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात नोकरीसाठी गेलेले चाकरमानी आपल्या गावी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध आले असून आपल्या गावी येणाºया चाकरमान्यांनादेखील काही दिवस क्वारंटाइन केले जाणार आहे. अशा परस्थितीतदेखील कोकणात चाकरमान्यांनी येण्यास सुरुवात केली असल्याने यांना प्रवासामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत जवळपास ५५० किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरामध्ये महामार्ग वाहतूक शाखेच्या पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबे आणि कसाल अशा सात चौक्या आहेत. या ठिकाणी सध्या ५ अधिकारी आणि १९९ कर्मचारी काम करत आहेत. दरवर्षी गणपती सणासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पर्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे गावामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. लॉकडॉऊनमुळे हे काम बंद होते. त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत कोकणात जाणाºया चाकरमान्यांना प्रवासात कोणतेही त्रास होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. मात्र यंदा बाहेरून या बंदोबस्तासाठी २० अधिकारी आणि १०० कर्मचारी अधिक मागवण्यात आले आहेत. त्यामुळे सात चौक्यांवर असलेल्या ५ अधिकाºयांमध्ये वाढ होत २५ अधिकारी झाले असून कर्मचाºयांमध्येदेखील १०० ने वाढ झाली आहे. यामुळे कर्मचाºयांची संख्या २९९ झाली आहे. हा बंदोबस्त बुधवारपासून सुरू झाला असून २ सप्टेंबरपर्यंत महामार्गावर तैनात राहणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.>सहा ठिकाणी वाहतूक पोलीस तैनातमहामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी आलेल्या नियोजनाप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. या शाखेची हद्द ६० किलोमीटर एवढी आहे. १ अधिकारी आणि ५ कर्मचारी कामकाज पाहत असल्याने एवढी मोठी हद्द सांभाळणे अवघड होते. त्यामुळे या शाखेत गणपती सणासाठी १ अधिकारी आणि २२ कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. या शाखेमध्ये आता २ अधिकारी आणि २७ कर्मचारी झाल्यामुळे चाकरमान्यांना या हद्दीमध्ये कोणतीच अडचण निर्माण होणार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी सांगितले आहे. या हद्दीमध्ये माणगाव, लोणारे, नातेखिंड, महाड एसटी डेपोसमोर, राजेवाडी फाटा आणि पोलादपूर असे सहा पॉइंट तयार करण्यात आले असून या ठिकाणी सतत पोलीस तैनात राहणार आहेत. मोबाइल व्हॅन मोटार बाइक पोलीस सतत गस्त घालणार आहेत. काही अडचण निर्माण झाल्यास जे.सी.बी., रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या असून दोन पॉइंटवर सीसीटीव्हीची नजरदेखील राहणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव