शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 02:24 IST

अलिबाग पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे.

अलिबाग : पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६.५३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून गुरु वार अखेर एकूण सरासरी १७९.०८ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस पोलादपूर तालुक्यात झाला आहे, तर सर्वात कमी माथेरान तालुक्यात झाला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. या कालावधीत येणाऱ्या संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २९ जून रोजी रायगड, ठाणे, मुंबईसह पालघर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पाऊस तुफान फटकेबाजी करणार असल्याने प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. काही मिनिटांमध्येच सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुपारी ४ वाजताच सायंकाळी ७ वाजता जसा अंधार असतो तशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.जिल्ह्यामध्ये दरवर्षी ७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वेळी २७ जूनपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसानंतर शेतामध्ये राब टाकण्यात आला होता; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने राब करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी बळीराजा सुखावला आहे. पाऊस बरसल्याने दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.नागरिकांची तारांबळआगरदांडा : मुरुड तालुक्यातील भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहाटेपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे. यामुळे नोकरीला जाणाºयांची व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, नंतरच्या काळात गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, गुरु वारी पावसाने दर्शन दिल्यामुळे थोडा का होईना पण शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. मुरुडसह परिसरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होती त्यामुळे नगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई दावा फोल ठरल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात रस्ते जलमय झाले. त्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. मुरुड तहसीलदार कार्यालयातून पावसाची २२ मि.मी.नोंद आहे.म्हसळा येथे ५२ मि.मी. पाऊसम्हसळा : तालुक्यातील विविध भागात गुरु वारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिपही सुरू आहे. यामुळे चाकरमानी व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर आकाशाकडे डोळे लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी मात्र सुखावला आहे.दडी मारलेल्या पावसाने अचानक धुवाधार बरसण्यास सुरुवात के ल्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले. म्हसळा तहसीलदार कार्यालयातून पावसाची ५२ मि.मी. नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पोलादपूरमध्ये पाऊसपोलादपूर : तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाली असून बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीच्या कामासाठी सज्ज झाला आहे, तसेच नुकतीच पेरणी होऊन गेल्यामुळे या पडलेल्या पावसामुळे रोपांची वाढ योग्य प्रकारे होणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस