शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:13 IST

रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे.

अलिबाग - जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. मागील २४ तासांत तब्बल एक हजार ११२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २४२ मिलीमीटर पाऊस अधिक पडला आहे. अलिबाग-कार्लेखिंड आणि मुरुड-बोर्ली येथे झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आगामी ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.भारतीय हवामान विभाग आणि स्कायनेट यांनी ९ ते १२ जून या कालावधीत २६ जुलै २००५ एवढा पाऊस पडणार असल्याचा इशारा आधीच दिला आहे. शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा अखंड दिवस जणू वरुणराजाच्याच नावावर दिला होता. सोसाट्यांच्या वाºयांसह त्यांनी न थकता बरसण्यास सुरुवात केल्याने सर्वांचीच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नगर पालिका, ग्रामपंचायतीने नालेसफाईचे केलेले दावे पावसाने खोटे ठरवले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने नाले दुथडी भरून वाहत होते. दरम्यानच्या कालावधीत समुद्राला भरती आल्याने त्याच नाल्यांच्या माध्यमातून पाणी सखल भागात साठल्याचे दिसून आले.वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्पपावसाला सोसाट्याच्या वाºयाची सोबत असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड आणि मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला परिसरामध्ये मोठे झाड रस्त्यामध्येच पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.पावसाचा आनंद घेण्यासाठी अलिबाग आणि मुरुड तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. रस्त्यामध्ये झाड पडल्याने त्यांना वाटेतच अडकून पडावे लागले. संबंधित यंत्रणेने रस्त्यातील झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.बचाव पथकांना दक्षतेच्या सूचनापुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, कामाशिवाय बाहेर पडू नये, समुद्र किनारी भागात राहणाºया नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.समुद्र किनारी येणाºया पर्यटकांना समुद्रामध्ये जाण्यापासून मज्जाव करावा. तेथील संबंधित बचाव पथकाने यावर लक्ष द्यावे. नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.मुरु ड तालुक्यात ४१४ मि.मी.ची नोंदआगरदांडा : मुरु ड तालुक्यातील सर्वच भागात गेले दोन दिवस विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लागल्याने शेतकरी सुखावले आहेत.आतापर्यंत तालुक्यात ४१४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाºयामुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.डोंगराळ भागात दरडींचा धोकाश्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कोलमांडला आडी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडला आहे. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. एसटीच्या सायंकाळपर्यंतच्या नियोजित फेºया बंद करण्यात आल्या आहे. सदर मार्गावर दैनंदिन वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील श्रीवर्धन शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे दरड कोसळण्याचा धोका आहे. कारण पावसामुळे डोंगरावरील दगड व माती रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे.श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. डोंगराळ भागात अनधिकृत बांधकामे वाढल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड